Wednesday, June 25, 2025

पुणे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचे नांव देणे बाबत.

 पुणे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचे नांव देणे बाबत.


पुण्याच्या खासदार, सौं. मेधाताई कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचे नांव देण्याची मागणी केली आहे. 


सर्व प्रथम मीं नमूद करू इच्छितो की ज्या रेल्वे स्टेशनची किंवा शहरांची नांवे ब्रिटिश, पोर्च्युगिझ, मोगल किंवा भारतावरील अन्य आक्रमकांच्या वंशावळी मधील आहेत ती बदलण्याबद्दल मीं नक्कीच आग्रही आहे, पण पुणे शहराचे नांव बदलण्याचे कारणच काय?  पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. 


मेधाताई पुण्यातील आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी असे विचित्र खेळ खेळत आहेत. जे वाद तयार करतात. काहीतरी विधायक कार्य करा. रस्ते वाढवून ट्राफिक जाम कमी करा. 


त्यातून खरोखरचं पुणे स्टेशनचे नांव बदलाचे आणि कोण्या महापुरुषाचे किंवा नामांकित महिलेचे नांव द्यायचे असेल तर त्यात प्रथम क्रमांक छत्रपती शिवाजीं महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा लागेल. 


शहाजीराजे भोसले हे आदिलशहाची नोकरीं सोडून निझामाला जाऊन मिळाल्यानंतर, शहाजी राज्यांना जरब बसवण्यासाठी, आदिलशहाने आपला सरदार मुरार जगदेव यांस,  १६३०-३१ मध्ये संपूर्ण पुणे शहर बेचीराख करण्यासाठी पाठवले. त्याने  ते शहर नुसतेच बेचीराख न करता पुण्याच्या जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरवला.


अशा वेळी शहाजी राज्यांनी छोटा शिवबा, राजमाता जिजाऊ आणि त्यांचा विश्वासू नोकर दादोजी कोंडदेव यांना पुण्याच्या जहागिरीकडे लक्ष देण्यासाठी मुक्कामाला पाठवले. 


पुण्यात आल्यानंतर पुण्याची अवस्था बघून जिजाऊ मातेला आणि शिवबाना संताप अनावर झाला आणि तेथे पडली हिंदवी स्वराज्याची पहिली ठिणगी. जिजाऊ मातेने मोठ्या कष्टाने आणि आपली सर्व संपत्ती पणाला लावून पुण्याची पुन्हा उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ साली चैत्र शुद्ध सप्तमी रोजी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वर येथे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली आणि पुढे घडला इतिहास. जर जिजाऊ नसत्या तर??


अर्थात थोरले बाजीराव सुद्धा तेव्हडेच पराक्रमी आणि त्यांचाही योग्य तो मान असायलाच हवा. हिंदवी स्वराज्याच्या पायावर त्यांनी कळस चढवला हे नक्कीच. पण आधी पाया महत्वाचा. तो जिजाऊ नी घातला.


माधव भोळे

No comments:

Post a Comment