प्रॉमिस डे.
काल ११ फेब्रुवारी म्हणजेच प्रॉमिस डे होता. अलीकडे तारुण्यात आलेली मंडळी हा प्रॉमिस डे, व्हॅलेंटाईन डे वगैरे डे अगदी मनाने पाळतात. डे तरी नक्की पाळतात. मग दिलेले प्रॉमिस पाळतात की नाही कोणजाणे?
आमच्या भारतीय संस्कृती मध्ये सुद्धा असेच एक वचन सर्व विवाहित जोडपी एकमेकांना विवाहाच्या दिवशी सप्तपदी करताना करतात. धर्मेच, अर्थेच,कामेच् नातीचरामी.
म्हणजेच धर्माच्या राक्षणासाठी, संसराच्या अर्थकारणासाठी आणि विवाह बद्ध कामक्रिडेसाठी माझ्या चांगल्या आणि वाईट दिवसात मीं तुला साथ देईन.
आपल्या हिंदू धर्माचा पाया ह्या अतूट विश्वासावर अवलंबून आहे. वचन हे एक स्वतः घालून दिलेले बंधन आहे. पण आपण ते खरोखर पाळतो का? हे प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवे.
एके काळी दशरथाने कैकयीला दिलेले वचन पाळले, जे पाळण्यासाठी प्रभू श्री रामाला १४ वर्ष वनवासात काढावी लागली.
हेच वचन सैरध्रीने म्हणजेच द्रौपदिने पाळले, जरी तिच्या अब्रूचे धिंडवडे दुर्योधन आणि दुष्यासनाने भर सभेत हतबल अशा तिच्या पाच पतींसमोर काढले.
अगदी राजा हरिषचंद्राने सुद्धा स्वप्नात विश्वामित्राला आपले संपूर्ण राज्य दिल्याचे वचन सुद्धा पाळले.
कधी कधी अशा नीतिमत्तेचा राग येतो आणि चूक काय बरोबर काय हाच प्रश्न निर्माण होतो.
ह्या वचना निमित्त एक सुंदर गीत आठवते
स्वरगंगेच्या, काठावरती
वचन दिले तू, मला......
गतजन्मीची, खूण सापडे,
ओळखले का मला
वदलीस तू मी, सावित्री ती.....
शकुंतला मी, मी दमयंती
नाव भिन्न परि, नाव भिन्न परि
मी ती प्रिती
चैतन्याचा पूर तेधवा, गंगेला पातला
या, स्वरगंगेच्या, काठावरती
वचन दिले तू, मला......
माधव भोळे