Saturday, February 28, 2026

AI ची भीती

AI ची भीती.


IT आणि तत्सम इंडस्ट्री मध्ये आलेल्या AI च्या अभूतपूर्व वादळाने सर्व प्रस्थापित IT कंपन्याचे आणि त्यातील गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे IT मध्ये पूर्वी मुख्यत्व करून असलेल्या कोडींग ( प्रोग्रॅमिन्ग ) च्या कामामध्ये AI चे अतिक्रमण झाल्यामुळे प्रोग्रामरच्या नोकऱ्या कमी होणार आहेत. अंथ्रॉपिक ह्या AI tools बनवणाऱ्या कंपनीनी काल COBOL सारख्या पूर्वी मेनफ्रेम कॉम्पुटरवर चालणाऱ्या प्रोग्रॅमिन्ग भाषेत सुद्धा आपले AI टूल तयार झाल्याचे जाहीर केल्यामुळे मेनफ्रेम कॉम्पुटरची कामे असलेल्या IBM, L & T, TCS, Infosys, Hexaware सहित अनेक प्रस्थापित लोकांचे धाबे दणाणाले आहेत. 


परंतु AI जरी लॅबोरेटरी लेव्हल जरी यशस्वी होत असले तरी त्याचा व्यवहारात यशस्वी उपयोग व्हायला अजून ३ ते ५ वर्ष जातील. IBM सारख्या कंपनीकडे पूर्वी, ऑइल, एयरललाईन्स सारख्या अनेक मोठमोठ्या इंडस्ट्रिजचे काम आहे जे वर्षानुवर्षं सुधारणा होत आतापर्यंत यशस्वी चालत आहेत. अशा कंपन्यांचे जुने प्रोग्राम सुधारता सुधारता अनुभवी प्रोग्रामरच्या नाकाला फेस येतो कारण मूळ डॉक्युमेंटेशन, त्यात झालेल्या सुधारणा आणि त्यात असलेल्या त्रुटी यामुळे असे प्रोग्राम सुधारणे अथवा बदलणे ( मेन्टनन्स ) अत्यंत गुंतागुंतीचे काम असते. त्यामुळे ते जॉब्स जाण्याची शक्यता कमी आहे. कारण चालू गाडी सोडण्यास कोणीही तयार नसते. भारतात बऱ्याच नोकऱ्या याच विषयात आहेत. ( लेखक स्वतः ह्या विषयातील अनुभवी आहे ).


रहाता राहीला प्रश्न नवीन सिस्टीम बनवण्याचा. जेथपर्यंत एखादा प्रश्न, गरजा एकदम बरोबर समजला नाही आणि तो AI टूल्सना समजावून सांगितला जाणार नाहीत तेथपर्यंत AI योग्य प्रोग्राम बनवून शकणार नाही. चुकीचे ऍनालिसिस असेल तर चुकिचे परिणाम दिसून येतील. ( Garbage in Garbage out ).


त्यामुळे या भागात तर्कशुद्ध विचार करत प्रश्न किंवा गरजा समजून घेणारे आणि ते सोप्या भाषेत AI tools ना समजावून सांगणारे "Prompt Engineer" हा नवीन रोल तयार होत आहे. तसेच AI ने तयार केलेल्या सिस्टीम टेस्ट करण्याच्या टेस्टिंग इंजिनियर च्या नोकऱ्या तशाच राहणार आहेत. 


त्यामुळे एकंदरीत नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल पण भारतातील नोकऱ्यामध्ये फार घट येणार नाही असे वाटते. या उलट जगभर अनेक क्षेत्रामध्ये AI मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी चढाओढ वाढेल आणि ते वाढीव जॉब भारतात येतील. कारण जी तांत्रिक विषयातील आणि शास्त्र ( science ) विषयातील शिक्षित मॅनपॉवर भारतात आहे तशी इतर देशात कमीच आहे. 


आणखी एक गोष्ट म्हणजे एजन्टीक AI टूल्स मुळे जे रुटीन, रिपीटीटिव्ह नोकऱ्या जसे की KPO, BPO, ऑपेरेशनल नोकऱ्या यात कपात होण्याची शक्यता आहे हे खरे आहे.


या उलट डेटा अनालीसिस, डेटा सायन्स, ब्लॉक चेन, क्लाऊड कॉम्पुटिंग सारख्या विषयाचा वाढता वापर भारतात आणखी नवीन नोकऱ्या निर्माण करतील असे वाटते.


माधव भोळे 



राघव चड्डा आणि अतिशयोक्ती

 राघव चड्डा आणि अतिशयोक्ती 


सध्या संसदेत एक वादळ आले आहे. त्याचे नांव आहे राघव चड्डा. शिक्षणाने आणि पेशाने चार्टड अकाउंट असलेला, आप पार्टीचा हा तरुण राज्यसभा खासदार सरकारच्या कारभारातील त्रुटी शोधून काढून लोकांचा आवाज संसदेत उठवत अतिशय चांगले काम करीत आहे. नुकत्याच झालेल्या बजेट सत्रात त्याने सम भागवरील कॅपिटल गेन टॅक्स आणि STT मधील त्रुटी, विमाधारित रोग्यांची हॉस्पिटल कडुन होणारी लूटमार, बँकेतील न्यूनतम शिल्लक आणि ऐटीएम चार्जेस, होम लोन मध्ये घर गहाण असताना इन्शुरन्स पॉलिसी काढण्यासाठी बँक करीत असलेली जबरदस्ती इत्यादी विषय मांडले. ते खरोखरचं सरकारला आणि प्रशासनाला जागे करणारे आहेत. 


पण त्याने आणखी एक मुद्धा मांडला की सरकार फक्त थोड्याच नोकऱ्या देते पण लाखो विद्यार्थी लाखो रुपये भरून अभ्यास करत आहेत त्यांना जर नोकरीं नाही मिळाली तर त्यांची फी परत करायला हवी. हा मुद्धा अतिशय चुकीचा आहे. मुळात नोकरीं मिळवण्यासाठी किंवा करण्यासाठीच शिक्षण घ्यायला हवे हा विचारच मुळात चुकीचा आहे. 


मुळात सरकारने प्रत्येक शिक्षिताला नोकरीं देणार किंवा बेकारी भत्ता देणार असे आश्वासन दिलेले नाही. शिक्षण घेणे जबरदस्ती नाही. जगाच्या व्यवहारात आपल्याला हुशार बनायचे असेल किंवा आपल्याला आपल्या पायावर उभे राहायचे असेल तर शिक्षण नक्कीच उपयोगी पडते. पण आपण काय शिकता, कसे शिकता, त्याचा वापर आपण व्यक्तिगत जीवनात आणि सार्वजनिक जीवनात कसा करता हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. तुम्ही शिक्षणासाठी फी भरली होती त्या मधून शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांचे प्रशासकीय आणि शिक्षण खर्च निघून गेले आहेत. त्यामुळे सरकार किंवा ती विद्यापीठे तुम्हांला डिग्री सोडून काहीही देय लागत नाहीत. त्यामुळे हा मुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे. 

राघव चड्डा आपण चांगले काम करता तेव्हा सदसदविवेक बुद्धी वापरून प्रश्न उपस्थित करा ही विनंती. विरोधा साठी विरोध नको.


माधव भोळे.

Thursday, February 26, 2026

तंजावरचे मराठा साम्राज्य.

तंजावरचे मराठा साम्राज्य.


छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजी महाराज अनेक वर्ष कधी विजापूर दरबारीं तर कधी निजाम दरबारीं एक प्रमुख सरदार म्हणून नोकरीं करीत असत. त्यांना ३ पत्नी होत्या, त्यातील प्रथम पत्नी जिजाबाई साहेब ( माहेरच्या जाधव ), द्वितीय पत्नी तुकाबाई ( माहेरच्या मोहिते ) आणि तृतीय पत्नी नरसाबाई. शहाजी राज्यांकडे पुणे आणि बंगलोर अशा दोन जहागिऱ्या होत्या. पैकी पुणे जहागिरी जिजाऊ माता सांभाळत तर बंगलोरची जहागिरी तुकाबाई सांभाळत. 


शहाजी राज्यांना जिजाऊ पासून छत्रपती शिवाजी आणि संभाजी असे दोन पुत्र झाले तर तुकाबाई पासून व्यंकोजी ( एकोजी १ ) पुत्र झाला आणि नसराबाई कर्नाटकी होत्या त्यांना संताजी आणि कोयाजी अशी दोन मूले होती. संभाजी शहाजी भोसले आपल्या वडिलांबरोबर असत आणि त्यांनी विजापूरच्या आदिलशाही मध्ये सरदारकी केली.


शहाजीराजे स्वारी निमित्त जास्तकरून बंगलोर वास्तव्यात तुकाबाई बरोबर रहात असत. पुढे शहाजीराज्यांचे एक पुत्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी विजापूरच्या बादशहाकडे नोकरीं करत असताना स्वपराक्रमावर दक्षिण भारतातील तंजावर येथे ५ मार्च १६७६ रोजी दक्षिणेतील स्वतंत्र मराठी राज्य स्थापन केले. शहाजी राजे यांच्या शेवटच्या काळात नसराबाई त्यांचे जवळ रहात असल्यामुळे बंगलोर जाहगिरी नसराबाईंच्या ताब्यात गेली.


पुढे १६७६ ते १६७८ मध्ये छत्रपती शिवाजी राज्यांनी दक्षिण दिग्विजय स्वारी करताना आपले सावत्र बंधू संताजी ( नसराबाईंचे सुपुत्र ) यांच्या साहाय्याने मद्रास ( चेन्नई ) जवळील वेलोर आणि जवळील जिंजीचा किल्ला जिंकून दक्षिणेत आपला दरारा वाढवला. त्यानंतर त्यांनी दोन्ही ठिकाणी आपले प्रशासक नेमले. ह्या स्वारीमुळे छत्रपतींच्या ताब्यात त्या विभागातील ७२ डोंगर आणि १४ किल्ले आले.


ह्या स्वारीमध्ये त्यांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजी महाराजांची तंजावर येथे भेट घेतली आणि त्यांना स्वराज्याच्या मोहिमेत सामील होण्याची विनंती केली तसेच त्यांच्या वडिलांच्या सामायिक मालमत्तेबद्दल विभागणी करण्याची मागणी केली, परंतु व्यंकोजीनी त्या दोन्ही गोष्टीकडे दुर्लक्ष केले. 


आज त्या तंजावरच्या मराठा राजवाड्यात काही भागात भेट देण्याची संधी मिळाली. त्याची काही क्षणचित्रे.


माधव भोळे 

NCERT आणि सुप्रीम कोर्ट यातील वाद

NCERT आणि सुप्रीम कोर्ट यातील वाद 

नुकताच आडवोकेट कपिल सिंबल आणि अभिषेक मनु संघवी यांनी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे तक्रार केली की NCERT च्या ८ वि च्या पुस्तकात कोर्टामधील भ्रष्टाचार, न्यायालयीन प्रक्रिया इत्यादी विषयवार असलेल्या धड्यात आक्षेपार्ह मजकूर आहे. त्यावर मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की पृथ्वीवरील कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला अशा प्रकारे न्यायालयाचा अपमान करण्याची ताकद नाही. त्यांनी NCERT वर एकतारफा ( sue moto) केस टाकली आणि त्यामुळे NCERT ने ताबडतोब न्यायलायाची माफी मागितली.


खरे म्हणजे अशी वेळच का यावी की सुप्रीम कोर्टाने आपल्यावर झालेली टीका दबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या विशेष अधिकाराचा उपयोग करावा? सुप्रीम कोर्टाने अशी टीका सकारात्मक घेऊन त्याची माहिती आणि तथ्य समजून घ्यायला हवी. 


ज्या देशात श्रीरामाने एका सामान्य धोब्याच्या आक्षेपावर आपली पत्नी सीतेला अग्नी परीक्षा द्यायला लावली. राम शास्त्री प्रभुणे सारखे निपक्ष न्यायाधीश असताना, आई नाराज होईल हे माहिती असताना सुद्धा गुन्हेगार मामा मल्हारराव रास्ते यांना कैदेत टाकायचे फर्मान दिले त्या माधवराव पेशवे या देशाच्या इतिहासात असताना कोर्टावर भ्रस्टाचाराचा आरोप केला जातो ती परिस्थिती दुर्दैवी आहे असेच म्हणायला हवे.


जेथपर्यंत जस्टीस वर्मा, ज. सौमित्र सेन, ज. पि दिनकरन, ज. सी एस करनन सारखे लोक ह्या सिस्टीम मध्ये आहेत तो पर्यंत टीका करण्याचा अधिकार जनतेला आहे. असे नसते तर संविधानात removal of judges and impeachment provision ठेवले नसते. जस्टीस सूर्यकांत यांनी जसे NCERT वर sue moto केस केली तशी ह्या विषयात असे न्यायाधीश आणि न्यायालय प्रशासन ह्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपसाठी स्थायी चौकशी कमिशन नेमणे आवश्यक आहे. 


जस्टीस सूर्यकांत चांगले काम करतात परंतु त्यांनी आपल्या शवागारात किती मुडदे आहेत हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. जों न्याय सर्व भारतीयांना तोच कोर्टाला असायला हवा. 


माधव भोळे 

तामिळनाडू एक झलक.

तामिळनाडू एक झलक.

नुकतेच तामिळनाडू मध्ये विविध मंदिरे आणि शहरांना भेट देण्याचा योग आला. त्यातील निरीक्षणे खालील प्रमाणे.

१) स्वच्छ आणि सुंदर रस्ते. हायवे ट्राफिक विरहित. 

२) स्वच्छते बद्धल नागरिक जागरूक आहेत.

३) चेन्नई पासून सुरवात करून वेल्लोर, श्रीपुरम, कांचीपुरम, महाबलीपुरम, थिरूअण्णामलाई, चिदंबरम, तंजावर, त्रिची, पलानी, कोडाईकनाल इत्यादी शहराना भेट दिली. हायवे लगतची सर्व गावेच्या गावे सपाट आणि काळी कसदार किंवा तांबडी माती असलेली भातशेती, ऊस, अन्य धान्य शेती, तुती ( रेशीम किड्यांचे अन्न रेशीम शेती साठी उपयोगी ) आणि निलगिरीची झाडें होती आणि सर्वत्र हिरवेगार होते. फक्त जिंजी किंवा थिरूअण्णामलाई येथे डोंगर असल्यामुळे माकडे दिसली.


४) पल्लवा साम्राज्य ( ३ ते ९ वे शतक ), चोला साम्राज्य ( ९ ते १३ वे शतक ), आणि मदुराईचे नायक साम्राज्य किंवा विजयनगरचे साम्राज्य ( १४ ते १७ वे शतक ) या काळात बांधले गेलेले भले मोठे मंदिर परिसर ( Temple Complexes ). त्यात अगदी चुना किंवा सिमेंट रहित दगडी बांधकामा पासून चुना आणि गूळ मिश्रण असलेला पदार्थ वापरून भल्या मोठ्या भव्य दिव्य मंदिरांची उभारणी झाली असून त्यातील बहुतांश बांधकामे आजही टिकून आहेत. लोक रांग लावून दर्शन घेतात आणि कोठेही धक्का बुक्की नाही. तुम्ही थाळीत पैसे टाका अथवा नका टाकू, पुजारी तुम्हांला तीर्थ प्रसाद देतात. अनेक ठिकाणी विशेष दर्शन रु. १० ते ५० पर्यंत तिकीट आहे त्यामुळे रांगेत उभे राहायचा वेळ वाचतो. संपुर्ण मंदिर परिसर स्वच्छ असून कोणीही घरचे डबे आणून तेथेच खायला बसत नाहीत. बहुतेक ठिकाणी चप्पल स्टॅन्ड आहेत आणि नसला तरी चपला चोरी होत नाहीत. 


बहुतेक सर्व ठिकाणी फक्त त्यांच्या तामिळ भाषेत माहिती आणि देवतेची नांवे आहेत त्यामुळे समजतं नाही. फक्त photography not allowed ते मात्र इंग्लिश मध्ये सुद्धा लिहिलेले🤪. शिवाय देवळे भव्य पण गाभारे लहान तसेच काळोखी. देवांच्या मूर्ती सुद्धा काळ्या पाषाणाच्या. फक्त समया किंवा पणत्याचा उजेड त्यामुळे मूर्तीचा आकार आणि चेहरा नीट दिसत नाही. गाभाऱ्यात विजेचा प्रकाश नाही. 


वरदराज पेरूमल मंदिर ( २३ एकर ), अण्णामलाईयार मंदिर, अण्णामलई नगर ( २५ एकर ), एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरम ( २५ एकर ), नटराज मंदिर चिदंबरम ( ४० एकर ), श्री लक्ष्मी सुवर्ण मंदिर, वेलोर ( १०० एकर ), रंगनाथ स्वामीं मंदिर श्रीरंगम ( १२६ एकर ). असे मोठ मोठाले मंदिर कॉम्प्लेक्स असून बहुतेक मंदिरांना २५, ३० फूट उंच दगडी तटबंदी आहे. अनेक मंदिराना चारही बाजूला किंवा दोन बाजूला प्रवेशद्वारे असून मोठ मोठाली नक्षीकाम केलेली गोपुरे आहेत. सर्व गोपुरे जवळजवळ सारखीच दिसतात त्यामुळे आलो कोणत्या गोपूरातून आणि बाहेर कोठून पडलो तेच कळत नाही. अनेक ठिकाणी गोपूराला नांवे दिली आहेत ( तामिळ मध्ये). मंदिरांमध्ये अप्रतिम कोरीव दगडी बांधकाम असून प्रत्येक देवतेसमोर दगडी कोरीव सभामंडप आहेत. एव्हडे कोरीव बांधकाम परत होणे शक्य नाही. ब्रिटिश आणि फ्रेंच कोरीव कामे सुंदर असतात पण ही त्या पेक्षाही सुंदर आहेत.


बहुतेक मंदिरे शंकर, पार्वती, विष्णु, लक्ष्मी, कार्तिक स्वामीं ( मुरुगन, सुब्रमण्यम ), श्रीकृष्ण, गणपती ( विनयागार किंवा पिल्लयार ) या देवांची आहेत. येथे कार्तिक स्वामीं हा विवाहित असून त्याला इंद्राची मुलगी देवयानी आणि वल्ली नावाची आदिवासी जमातीच्या राजाची मुलगी ( भिल्लीण ) अशा दोन पत्नी सुद्धा आहेत. आपल्याकडे किंवा उत्तरेत कार्तिक स्वामीं अविवाहित मानला जातो.  


५) तामिळनाडू मध्ये अनेक रेस्टॉरंटच्या मोठमोठ्या साखळ्या आहेत जसे की हॉटेल सरवाना भवना ( १०० रेस्टॉरंटस), अडियार आनंद भवना ( २०० रेस्टॉरंटस ), सागर रत्न रेस्टॉरंटस ( ११० रेस्टॉरंटस). आपल्याकडे अशा कामत, शिवसागर, कैलाश परबत, भगत ताराचंद सारख्या थोड्याफार साखळी रेस्टॉरंट आहेत पण ते सर्व अमराठी मंडळीची आहेत. 

दत्त स्नॅक्स, पणशीकर मिठाईवाले, जोशी वडेवाले सारखे काही मोजके नामचिन सोडले तर वेलणकर, विनय हेल्थ, तृप्ती सारखी मंडळी "आमची कोठेही शाखा नाही" ह्या ब्रीद वाक्यावर परमआनंद मानतात. त्याचे कारण सक्षेशन प्लॅन आणि कॉर्पोरोटायझेशनचा अभाव. 


६) कल्याण ज्वेलर्स, तनिष्क, शिवाय ज्वेलरी आणि साड्याची भव्य झगमगीत दुकानें इतर दिवशी सुद्धा ग्राहकांनी भरलेली दिसली. 

७) त्रिची ( त्रिचनापल्ली ) मधील एका कपड्याच्या आणि साड्यांच्या मॉल मध्ये गेलो होतो त्याचे शॊरूम ३ लाख sq ft आहे. तामिळनाडू मधील शुद्ध रेशमी कांजीवरम साडी ( प्युर सिल्क ) १० हजार ते ३०-३५ हजारापर्यंत जाते. ( आकडे ऐकूनच खाली उतरलो 🤪).


८) बहुतेक शहरे विस्तारत असून बंगले सिस्टीम अजून अस्तित्वात आहे. मोठ मोठ्या शहरात सुद्धा गगनचुंबी इमारती हातांच्या बोटावर मोजण्या एव्हडयाच दिसतात. अनेक शहरांना धार्मिक महत्व असून एकंदरीत लोक धार्मिक आणि समाधानी वाटले.


९) तामिळनाडू च्या राजकारणामध्ये सिनेमा स्टार्स आणि सुपर स्टार्स णा खूप महत्व आहे. येथे लोक हिरोस ना देव मानणारी लोक आहेत.

१०) तामिळनाडू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांचे स्वतंत्र मराठा साम्राज्य होते ही आनंदाची बाब आहे.


३० वर्षा पूर्वी तामिळनाडू मध्ये उटी, मदुराई, रामेश्वरम येथे गेलो होतो. त्या वेळची त्यांची गरिबी बघितली आहे त्या मानाने आता नक्कीच सुबत्ता आहे असे वाटते.

माधव भोळे 


Sunday, February 22, 2026

अड्यार आनंदभवना

 काल तामिळनाडू मधील एका हॉटेल मध्ये गेलो होतो त्याचे नांव आहे अड्यार आनंदभवना. अतिशय सुंदर पदार्थ आणि सेवा सुद्धा.



अड्यार आनंदभवना ( शुद्ध शाकाहारी ) विश्रांती गृह ( A2B restaurants ) ची यशोगाथा


( खास भारतीय मिठाई आणि स्नॅक्सचे घर | उच्च श्रेणीचे भारतीय शाकाहारी रेस्टॉरंट )


आमचा प्रवास हा आमच्या अविचल भावनेचा आणि समर्पणाचा पुरावा आहे; आमच्या लाडक्या संस्थापक दिवंगत के एस तिरुपती राजापासून सुरू झालेला वारसा. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात, त्यानी चेन्नई आणि मुंबईमध्ये आपल्या पाककौशल्याचा उपयोग करून घरापासून दूरचा प्रवास सुरू केला. टेबल क्लीनर म्हणून नम्र सुरुवातीपासून, त्यांनी मिठाई बनवण्याच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवले.


एका क्षणी, त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर शेती करण्यासाठी राजापलायमला परतावे लागले. सर्व मेहनत फळाला आली आणि यश त्याच्या दारात आले. लवकरच, त्यांनी विस्ताराची योजना आखली. कर्जाऊ घेतलेला निधी आणि आशेने भरलेल्या अंतःकरणाने, त्याने अधिक परताव्याच्या अपेक्षेने लगतच्या शेतजमिनी भाड्याने घेतल्या.


शेती खऱ्या अर्थाने भरभराट होत असताना, खोलवर, तरीही त्याने आपली स्वप्ने सोडली नव्हती. 1960 मध्ये, त्यांनी गुरू स्वीट्स, एक लहान मिठाईचे दुकान सुरू केले, ज्याने त्यांच्या उद्योजकीय व्यवसायाची सुरुवात केली. तथापि, त्यांच्या जीवनाला अनपेक्षित वळण मिळाले जेव्हा त्यांच्या शेतजमिनीत एक दुर्मिळ आणि विनाशकारी धुळीच्या वादळाने त्यांचा संपूर्ण नाश केला. त्याने अखलेला सर्व विस्तार उधार घेतलेल्या निधीवर होता, अनपेक्षित आपत्तीमुळे पीक अपयशी झाल्यामुळे तो कर्जाच्या डोंगराखाली गेला.


1970 च्या मध्यात त्यांनी बेंगळुरूला स्थलांतरित होण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुकान चालवण्यासाठी त्यांच्या मुलांनी शिक्षण पुढे ढकलले.  आपल्या प्रेमळ पत्नी आणि दोन मुलांच्या अतूट पाठिंब्याने त्यांनी श्रीनिवास स्वीट्सची स्थापना केली.



त्यांचा प्रवास तडजोड आणि कठोर परिश्रम यांनी भरलेला होता. चार जणांचे कुटुंब विनम्रपणे जगत होते, आमच्या संस्थापकाने मिठाई तयार केली, त्यांच्या पत्नीने मदत केली आणि त्यांचे दोन मुल दुकानाचे विविध पैलू सांभाळत. अनेक आव्हानांचा सामना करूनही, त्यांचा निर्धार फळाला आला, ज्यामुळे त्यांना बंगळुरूमध्ये नवीन सुरुवात झाली.


1979 मध्ये, आमचे प्रिय संस्थापक, त्यांचे पुत्र केटी वेंकटेशन आणि केटी श्रीनिवास राजा यांच्यासमवेत, चेन्नईच्या वॉशरमनपेट येथे त्यांचे पहिले मिठाई दुकान उघडले. त्यांनी त्याला श्री आनंद भवन असे नाव दिले. व्यवसायाची भरभराट झाली आणि लवकरच अड्यारमध्ये दुसरे आउटलेट सुरू झाले. अड्यार आउटलेटचे प्रचंड यश लवकरच ओळखीचा भाग बनले. आणि अशा प्रकारे अड्यार आनंद भवनाचा जन्म झाला.


लवकरच आम्ही संपूर्ण चेन्नईमध्ये विस्तार केला आणि भारतातील विविध प्रदेशातील मिठाईची चवदार श्रेणी सादर केली. दर्जेदार आणि परंपरेबद्दलची आमची दृढ वचनबद्धता मिठाई उद्योगात अड्यार आनंद भवनाला वेगळे बनवते.


2005 मध्ये, आम्ही रेस्टॉरंट व्यवसायात प्रवेश करून, अड्यार आनंद भवन मिठाईच्या बरोबरीने A2B रेस्टॉरंट्स सुरू करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या निर्णयामुळे केवळ महसूलच वाढला नाही तर गुणवत्ता आणि परंपरेसाठी आमची प्रतिष्ठा वाढवून आमची ब्रँड किमत सुद्धा वाढली आहे.


आज, अड्यार आनंद भवन ही १२०० कोटींहून अधिक उलाढाल असलेली कंपनी असून १२,००० हून अधिक कर्मचारी आणि तामिळनाडू (९४), कर्नाटक (६५), आंध्रप्रदेश (४३), दिल्ली, पोंडेचरी,  यूएसए, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि यूके येथे जागतिक शाखा आहेत. आम्ही या उल्लेखनीय प्रवासावर विचार करत असताना, आम्ही अभिमानाने त्या मूल्यांचे समर्थन करतो ज्यांनी आम्हाला सर्व मार्गांनी मार्गदर्शन केले - कुटुंब आणि विश्वासाचे महत्त्व, गुणवत्तेसाठी समर्पण आणि समाजाला परत देण्याची वचनबद्धता. कारण यातूनच एका छोट्या मिठाईच्या स्टॉलचा जागतिक ब्रँड म्हणून विकास झाला, जो अस्सल परंपरा दर्शवतो.

* माहिती त्यांच्या A2B.world वेबसाईट वरून आपल्यासाठी गुगल भाषांतरित केली आहे. मला जे भावते ते मी पोस्ट करतो.

माधव भोळे

Saturday, February 21, 2026

विद्वान सर्वत्र पूज्यते!!

 विद्वान सर्वत्र पूज्यते!!


चेन्नई आडियार मधून मैलापुर रोडला जात असताना वाटेमध्ये दुर्गाबाई देशमुख नावाचा रस्ता लागला. सर्वत्र तामिळ राजकारणी आणि महापुरुषांच्या नावाने रस्ते असताना मराठी स्त्रीच्या नावाने रस्ता आहे हे बघून अतिशय आनंद झाला.


कोण आहे ह्या दुर्गाबाई देशमुख?

नंतर लक्षात आले की भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि भारताचे तृतिय अर्थमंत्री ( १९५० ते १९५६)  सर चिंतामणराव देशमुख, ICS  यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख. 


दुर्गाबाईंचा जन्म आंध्र प्रदेशातील ( पूर्वीचे मद्रास राज्य ) राजमंद्री गावात एका वैदिक कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नांव गुम्मीदिडाला असे होते. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे त्यांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी सुब्बाराव नावाच्या व्यक्तीशी झाला, परंतु दुर्गाबाई सज्ञान झाल्यावरती त्यांनी हा विवाह नाकारला आणि त्या परत आपल्या आई-वडिलांच्या घरी आल्या. या विषयात त्याना त्यांच्या आई-वडिलांचा संपूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या मते त्या सज्ञान नसताना त्यांचा विवाह होणे योग्य नव्हते.


लहानपणापासूनच त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यां आणि महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. सासरहुन परत आल्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केले आणि १९४२ साली मद्रास विश्वविद्यालयातून त्या वकील झाल्या. त्यांनी स्त्री उतथान  आणि सामाजिक सुधारणानसाठी मोठी चळवळ उभारली. त्या केंद्रीय सामाजिक विकास समितीच्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिलांसाठी विशेष कौटुंबिक न्यायालये सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला.


भारताच्या ३८९ सदस्य असलेल्या संविधान आराखडा समितीच्या १५ महिला सदस्यांपैकी त्या एक होत्या. १९५२ साली काँग्रेसतर्फे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हरल्यानंतर त्या भारताच्या प्लॅनिंग कमिशनच्या पहिल्या महिला सदस्य झाल्या. 


१९४९ मध्ये चिंतामणरावांची ब्रिटिश पत्नी Rosina

Arthur Wilkox ( पहिली पत्नी ) निर्वातल्यानंतर १९५३ साली त्यांनी दुर्गाबाईंकडे लग्नासाठी मागणी घातली. त्या वेळी त्या ४४ वर्षाच्या होत्या. परंतु त्या दोघांचे विचार एक होते ते म्हणजे देशाचा विकास. चिंतामणराव आणि दुर्गाबाईंचा विवाहचे स्वतः नेहरू एक साक्षीदार होते. 


१९५६ साली मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये ह्या संबंधातील केंद्रीय कॅबिनेट बरोबर झालेल्या मतांतरामूळे चिंतामणरावांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला परंतु नेहरूंना चिंतामणरावांसारखा हिरा गमवायचा नव्हता म्हणून नेहरूंनी १९५० साली स्थापन झालेल्या प्लॅनिंग कमिशनच्या अध्यक्षपदी चिंतामणरावाची १९५६ साली नियुक्ती केली.


आपल्या निवृत्तीनंतर दुर्गाबाई आणि सी डी देशमुख हैद्राबाद येथे रहात असत. ९ मे १९८१ साली दुर्गाबाई आपल्या पतींचा आधी परलोकवासी झाल्या.


माधव भोळे