मरावे परी कीर्ती रूपे उरावे (डॉ. आनंद नाडकर्णी.)!
पूर्वी लोक म्हणत, माणसाची लोकप्रियता त्याच्या अंत्ययात्रेला येणाऱ्या लोकसमुदायावर समजली जाते.याबाबत टिळक, गांधी, नेहरू आणि बाळासाहेब ठाकरे यांनी रेकॉर्ड केले आहेत.
आजकाल लोक म्हणतात, माणसाची लोकप्रियता आणि उंची त्याच्या निधनानंतर समाज माध्यमातून आलेल्या मृत्यूलेखानावर समजते. आचार्य अत्रे, एक बिनधास्त स्पष्ट वक्ता. त्यांनी आयुष्यभर काँग्रेस आणि नेहरूना लाखोली वाहिली, पण म्हणतात अत्रे यांनी नेहरू गेल्यावर सतत ८ दिवस त्यांच्यावर अग्रलेख मराठा मध्ये प्रकाशित केले.
माझी आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांची ओळख नव्हती किंवा त्यांच्याबद्दल मला जास्त माहिती सुद्धा नव्हती. ( अर्थात मानसतज्ञा कडे जाण्याची कधी वेळी आली नाही. 🤪). परंतु गेले ३ दिवस समाज माध्यमातून आलेल्या लेखातून हे निश्चित समजते कीं डॉ. आनंद नाडकर्णी हे अनेकांच्या जीवनात किती थोर होते. तीच गोष्ट आशा ताई भोसले यांचे बाबतीत बघितली.
धन्य ती सर्व मंडळी. म्हणूनच म्हणतात मरावे परी कीर्ती रूपे उरावे.
माधव भोळे
No comments:
Post a Comment