Wednesday, April 8, 2026

नेहरू आणि डॉ. होमी भाभा

 नेहरू आणि डॉ. होमी भाभा 


अनेकवेळा फेसबुकवर आणि समाजमाध्यमातून नेहरुंच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या खाजगी आणि व्यक्तिगत जीवनावर आधारित टीकेची झोड उठवली जाते पण काही कार्याचे परिणाम दूरगामी असतात तर काही लगेच परिणाम दाखवतात. 


डॉ. होमी भाभा हे एक जगदविख्यात अणू शास्त्रज्ञ् होते तसेच भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंचे ते मित्र होते. अशी अनेक विद्वान माणसे नेहरूंनी जोडली होती.


भारत स्वतंत्र झाल्यावर एप्रिल १९४८ मध्ये डॉ. होमी भाभानी एक प्रस्ताव नेहरुंपुढे मांडला. तो म्हणजे ऍटोमॅटिक एनर्जी कमिशनचीं स्थापना. त्यांच्यामते भारताच्या ऊर्जा समस्या आणि दुरगामी प्रगतीसाठी अणूऊर्जा हा एक चांगला उपाय आहे. परंतु त्यासाठी लागणारे युरॅनियम भारताकडे नाही किंवा असले तरी त्याचे साठे अत्यल्प आहेत. त्यापेक्षा भारताकडे थोरियमचा साठा खूप आहे परंतु त्याच्यापासून अणूऊर्जा तयार करायला वेगळी प्रोसेस आहे आणि त्यावर अजून संशोधन होणे आवश्यक आहे. शिवाय एकदा युरानिम वापरले की ते खर्च होऊन जाते ( त्यापासून नवीन ऊर्जा तयार होऊ शकत नाही ) या उलट थोरियमचे खर्च झालेले इंधन परत रिफायन करून परत ऊर्जा तयार करण्यासाठी इंधन म्हणून वापरता येते. त्यामुळे थोरीयम हे अव्याहत चालणारे मटेरियल आहे. पण हे करताना डॉ. भाभानी एक अट नेहरुंपुढे घातली की ऍटोमॅटिक एनर्जी कमिशनचे स्वतंत्र बजेट असेल. त्याचीं मंजुरी संसदेत न होता थेट राष्ट्रपतींकडुन होईल. म्हणजे संशोधनाची गुपिते संसदेच्या सभागृहात चर्चेला येणार नाहीत आणि ती बाहेर जाणार नाहीत. नेहरूंनी ते मान्य केले.


70 वर्षांपूर्वी होमी भाभा यांनी अणुऊर्जेवर आधारित आत्मनिर्भर भारताची कल्पना केली होती. आज ती दृष्टी प्रत्यक्षात येत आहे.


भारताकडे आता एक अणुभट्टी आहे जी केवळ वीजच नाही तर वापरते त्यापेक्षा जास्त इंधन देखील तयार करते. चेन्नई ( तामिळनाडू ) पासून ८० किलोमीटर दक्षिणेला कल्पक्कम येथे, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर अणुभट्टी खर्च केलेले आण्विक इंधन वापरत आहे आणि एका अनोख्या प्रक्रियेद्वारे त्याचे ताजे इंधनात रूपांतर करत आहे ज्यामुळे आयात केलेल्या युरेनियमवरील अवलंबित्व कमी होते आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा मजबूत होते.


काल एक विशेष घटना जगाला सांगितली गेली. भारतातील हा प्रकल्प आता खर्च झालेल्या थोरियम पेक्षा जास्त थोरियम तयार करू शकतो. त्याला तांत्रिक भाषेत achiving criticality असे म्हणतात.


भारताकडे थोरियमचा जगातील सर्वात मोठा साठा आहे, जो देशाला शतकानुशतके सामर्थ्य देऊ शकतो. तथापि, थोरियमचा थेट वापर केला जाऊ शकत नाही आणि त्याची क्षमता अनलॉक करण्यासाठी यासारख्या प्रगत अणुभट्ट्यांची आवश्यकता आहे.


युरेनियम, प्लुटोनियम आणि सरतेशेवटी थोरियम-आधारित उर्जेच्या दिशेने प्रगती करत, भारताच्या तीन-टप्प्यांवरील अणुकार्यक्रमात हे यश एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.


असे म्हणतात की जगाकडे १०० ते १५० वर्ष पुरेल इतकाच युरानियम साठा आहे तर भारताकडील थोरीयम साठा निदान ७०० वर्ष पुरेल. त्यामुळे स्वच्छ आणी आत्मनिर्भर ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारताने आणखी एक पाऊल उचलले आहे.


जवाहरलाल नेहरू यांनी १७ वर्षात, भारताची उर्जीतावस्था असताना आणि हातात कमी पैसा असताना ( कारण होते ते सर्व इंग्रजानी लुटून नेले होते ) ७५ पेक्षा जास्त रचनात्मक संस्था तयार केल्या ज्याला ते "आधुनिक भारताची मंदिरे ( "The Temples of Modern India".).

त्यातील काही महत्वाच्या संस्थांची यादी खाली दिली आहे.

Science and Technology:

1. Bhabha Atomic Research Centre (BARC) 

2. Department of Atomic Energy (DAE) 

3. Indian Institutes of Technology (IITs) 

4. Indian Institute of Managements (IIMs) 

5. National Institute of Technologys (NITs) 

6. National Institute of Virology, Pune 

7. Indian Space Research Organisation (ISRO)


Healthcare and Medical Education:

8. All India Institute of Medical Sciences (AIIMS) 

9. Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education and Research (JIPMER)


Public Sector

10. Life Insurance Corporation of India (LIC) 

11. Oil and Natural Gas Corporation (ONGC) 

12. National Institute of Design (NID)


Higher Education and Research:

13. Jawaharlal Nehru University (JNU) 

14. Indian School of Mines 

15. National Library of India 

16. Jawaharlal Nehru Tropical Botanic Garden and Research Institute


Infrastructure:

17. Bhakra-Nangal Dam 

18. Bharat Heavy Electricals Limited (BHEL)


Others :

19. NDA

20. Indian School of Mines

21. Indian Institute of Virology

22. IMA

23. Kendriya Vidyalayas

24. Khadi Gramodyog

25. CSIR

26. National physical laboratory 

27. National Library of India

28. Chandigarh City

29. Indian Oil Corporation


पण दुर्दैव म्हणजे लोकांना नेहरुंचा एडविनाच्या सिगारेटला लाईटरने पेटवण्याचाच फोटो जास्त दाखवला जातो 😰


माधव भोळे 

No comments:

Post a Comment