Wednesday, April 23, 2025

काश्मीर आणि काश्मिरी उत्पादनावर बहिष्कार घाला!!

 काश्मीर आणि काश्मिरी उत्पादनावर बहिष्कार घाला!!


काल पेहेलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या २८ हिंदू पर्यटकांची क्रूर हत्या करण्यात आली. हत्या करताना प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म विचारून त्याला गोळया घातल्या गेल्या असे म्हणतात.


काश्मीर मध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये मीं प्रत्यक्ष गेलो असता तेथील जनतेशी संवाद साधण्याचा योग आला. मुस्लिम बहुल्य असलेली ही जनता १९४७ च्या काश्मीरचे भारताशी झालेले विलीनकरण ह्या मुद्यावर अडून बसली आहे. त्यांना अजूनही स्वतंत्र काश्मीर, कश्मिरीयत ( काश्मीरची संस्कृती ) आणि काश्मीरचे भौगोलिक स्थान याचा अभिमान आहे. भारताबरोबर झालेले विलीनकरण त्यांना मनःपूर्वक मान्य नाही. त्यांच्या तरुणांशी बोलताना असे लक्षात येते की त्यांच्या मते त्यांना भारताची गरज नाही आणि त्यांना शेख अब्दुलाने अपेक्षिलेला स्वतंत्र काश्मीर हवा आहे जों गिळायला पाकिस्तान टपलेली आहे.


काश्मीरच्या भौगोलिक स्थानामुळे आणि काश्मीर मधील राजकीय आणि सामाजिक प्रश्नांमुळे, गेले कित्येक वर्ष काश्मीरमध्ये मिलिटरीचे साम्राज्य आहे. स्थानिक नेते पाकिस्तान आणि टेररिस्ट लोकांची भाषा बोलतात. त्यांचा बोलवीचा धनी पाकिस्तान आहे.


आम्ही तेथे विविध ठिकाणी गेलो असता जागोजागी मिलिटरीचा पहारा होता. पर्यटक गाड्यांची आणि इतर वाहनांची कसून चौकशी होत असते. त्या दिवशी अमित शहा तेथे येणार होते तेव्हा प्रत्येक ८ फुटावर आणि घरांच्या छपरांवर मिलिटरीचा बंदूकधारी उभा होता. ते दृश्य बघितल्यावरच काय समजायचे ते समजलो.


जम्मू आणि काश्मीर मध्ये गेल्या वर्षी २.३६ कोटी पर्यटक आले होते तर नुसत्या काश्मीर मध्ये ३४.९८ लाख टुरिस्ट आले होते. एकट्या काश्मीर मध्ये ८००० कोटी रुपयांचा पर्यटन व्यवसाय झाला.


भारतातील पर्यटक काश्मीर मध्ये येत असल्यामुळे आणि स्थानक व्यापाऱ्यांचे पोट पर्यटन व्यसायावर अवलंबुन असल्यामुळे, गेले १० /१५ वर्ष दहशदवादि आणि स्थानिक व्यापारी यांच्यात एक अलिखित करार होता की पर्यटकांवर गोळ्या झाडायच्या नाहीत त्यामुळे पर्यटकांवर दहशदवादी हल्ले कमी झाले होते, पण काल त्या दहशदवाद्यानी माणुसकीचे सर्व संकेत तोडले आणि पर्यटकांवर हल्ला केला.


आपण काश्मीर बघायला जातो म्हणजे काश्मीरची बर्फअच्छादित हिमालयाची शिखरे बघायला जातो, तेथील सृष्टी सौंदर्य आणि मोठ मोठाले शाही बगीचे आणि दाल लेक मध्ये फेर फटका मारायला जातो, घोड्यावर बसून फोटो काढायला जातो. अर्थात यातील सर्व गोष्टी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दर्जिलिंग, कलिंमपॉंग, आसाम, मेघालंय या ठिकाणी बघायला मिळतात. मग काश्मीरच कशाला हवा. आपल्या पर्यटन कंपन्यानी नवीन पर्यटन सर्किट शोधावीत म्हणजे त्यांचे नुकसान होणार नाही आणि पर्यटकांना पर्याय उपलब्ध होतील.


या पुढे काश्मीर पर्यटनावर बहिष्कार घालणेच योग्य. त्यांच्या आर्थिक नाड्या जेथपर्यंत आवळल्या जातं नाहीत तेथपर्यंत हा हैदोस थांबणार नाही. पर्यटनाद्वारे अप्रत्यक्ष रित्या आपण त्यांच्या कारवायाना बळच देत आहोत. ते थांबायला हवे. तसेच सौरक्षण दृष्ट्या आवश्यक नसलेला काश्मीरच्या विकासावर भारताने खर्च कमी करावा जेणेकरून भारताबरोबर न राहिल्याचे तोटे त्यांना उमगतील. 


हे सुधारणार नाहीत मग आपण तरी सुधारूया.


माधव भोळे

Saturday, April 19, 2025

Letter to Mukesh Ambani

 20 th April 2025


To,

Mr. MukeshBhai Ambani Saheb,

Chairman,

Reliance Industries limited and Reliance group.


Sub: Wind Energy project in Konkan area.


Dear Sir, 

We are aware that RIL is an active player in the wind energy sector and other alternative energy sector.


I am from the Konkan area of Maharashtra. I am aware of some sites which will boost wind energy production at minimal cost in the country.


Kokan area of Maharastra has a vast sea shore of 720 km. It has a range of Sahyadri hills across sea shore. The area covers vast sunshine as well as natural wind giving huge potential to alternate energy production. 


Though the land near the sea shore is very costly due to tourism industry, the land on hill tops is available at very cheap rates even for lease, as it has basalt Rock. Due to its Rocky nature, such areas are not used for agricultural purposes. The winds coming from Sindhu sagar ( Arabian sea hovers through this hills 24 hours. 


Myself has this experience from a part of konkan in Guhagar taluka of Ratnagiri district, Maharashtra between Kajurli and Sade Jambhari having a stretch of 16 KM on hill tops. Similar areas exist on hill tops of my native village Veer in Chiplun Taluka of Ratnagiri district where wind flows constantly. 


I thought, why not utilize these natural resources to produce a wind energy which needs minimum land and it is eco friendly. You may also find similar opportunities elsewhere in Konkan which will develope non poluting industries and give extra income to people of Konkan.


If your organization is interested in visit, I am available on my mobile number 98194 79791.


Regards, 


Madhav Bhole




NEP 2020, महाराष्ट्र हिंदी अनिवार्य भाषा?

 NEP 2020, महाराष्ट्र हिंदी अनिवार्य भाषा?


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, महाराष्ट्रात टप्प्या टप्प्याने लागू करणार अशी घोषणा झाल्यानंतर मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये १ ली ते ५ वी साठी मराठी आणि इंग्रजीबरोबरच हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य करण्यात आली, त्यावर मा. राज ठाकरे पासून अनेक मान्यवर लोकांनी हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्यावर ठाम विरोध दर्शवला आहे.


विशेष म्हणजे इंग्रजी ही परकीय भाषा असूनही ती अनिवार्य असण्यावर कोणाला आपत्ती वाटत नाही पण हिंदी अनिवार्य म्हटले की डोके दुखते हे विशेष!.

इंग्रजी लोकांना चालते कारण ती आंतरराष्ट्रीय भाषा समजली जाते, पण ते खरे नाही. उत्तर अमेरिका, इंग्लंड, आफ्रिकेचा काही भाग, ऑस्ट्रेलिया, न्यू झिलंड सारखे काही मोजके देश सोडले तर इंग्रजीचा गंध सुद्धा नसलेले अनेक लोक जगात आहेत पण तरी सुद्धा इंग्रजी आपण अंतरराष्ट्रीय भाषा समजतो. मीं एक वर्ष स्पेन मध्ये रहात होतो. तेथील १० पैकी ९ लोकांना इंग्रजी समजतं नाही, लिहिता वाचता तर त्याहून येत नाही. 


मान्य आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. भारतात एकंदर २२ मुख्य भाषा, १२१ उपभाषा आणि १९,५०० मातृभाषा आहेत पण भारतासारख्या विविधता असलेल्या देशात स्वतःची अशी एक संपर्क भाषा असणे आवश्यक आहे.

गेले कित्येक वर्ष हिंदी ही प्रचलित संपर्क भाषा म्हणून भारतात वापरली जात आहे. कारण उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश सारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात हिंदीच प्रचलित आहे. भारतात हिंदी बोलणाऱ्यांची संख्या ५२.८३ कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ४३.६३% आहे. त्यामुळे ती भारतातील सर्वात जास्त बोली भाषा आहे. अशा परिस्थितीत व्यवहारिक दृष्ट्या हिंदी ही संपर्क भाषा मानायला काय हरकत आहे?


अशा परिस्थिती मध्ये जर आपल्या मुलांना हिंदी संपर्क भाषा म्हणून शिकायला लागली तर त्यांना व्यवहारात त्याचा नक्कीच फायदा होईल. जर इंग्रजी ही जगातील व्यवहाराची भाषा मानली तर हिंदी ही देशातील व्यवहाराची भाषा नक्कीच आहे.


अनेक शाळा इंटर नॅशनल स्कुलच्या नावाखाली फ्रेंच, जर्मन किंवा आणखी काही युरोपियन भाषा शिकवतात आणि त्यासाठी लाखो रुपये घेत आहेत त्याला आमचा विरोध नाही. पण हिंदी नको! म्हणतात ना घरकी मुर्गी दाल बराबर. 


बाकी राजकारण कोणत्याही विषयावर करता येईल.


माधव भोळे 



Tuesday, April 8, 2025

Kokan Railway's mishandled computerised online ticket booking system

 Kokan Railway's mishandled computerised online ticket booking system and doubts in general public's mind. 


The Kokan Railway is a busy route throughout the year and super busy during Ganpati / Holi festival and April / May Vacation period. The Railway admin has changed the advance ticket booking period from 120 days to 60 days giving more rush in a small period. 


I wanted to book Tutari Express ( 11003) for 16th May 2025 which starts at 00.05 from Dadar railway station in Mumbai. I logged into the Irctc.co.in website which is an authorised website for online booking.  

The online advance booking starts from 00.20 Am till 11.45 pm as per its website. I logged in on 00.20 Am on 17.03.2025 for booking tickets for 16.05.2025 and wanted to book for sleeper class. It was showing Available 229 seats as its status.


From 00.20 Am till 8.09 Am the message shown on the computer was "The booking for this class has not started, please try after some time". 


At 8.10 am it allowed me to book with available seats 19 only. So when were 210 seats booked when booking did not start?


At 8.10 am, I filled up online form for 3 passengers and went to menu for online payment. Paid Rs. 688.15/- i successfully paid the amount and the website logged me out automatically without showing my ticket. 

After logging into the irctc website again, and going to the last transaction menu, it showed me that the ticket is booked but with "RAC/WL" quota. That is waiting list.


How come 229 available tickets get manually booked in 3 minutes with people logging manually


I am an experienced programmer and I guess something is being tampered in the Online reservation system database. In programming there is called "cron jobs", where you can keep the data ready for your purpose and then feed the data to the system. The system will operate on the data and give results as desired. There is a possibility that somebody from bookingside is working on behalf of ticketing agents . 


A good programmer / System auditor can trace the Server as well as Database logs and pinpoint what is happening? Who is booking so many tickets without a system available to the general user? Whether revenue for such tickets is creditted to railway accounts? How can somebody tamper DB / System? Whether this is happening to Kokan Railway or to all busy railway routes? 


I request the vigilance department to look into the matter seriously, sumoto.


Madhav Bhole 


 


दीनानाथ मंगेशकर रुंग्णालय आणि जातीय समीकरणे.

 दीनानाथ मंगेशकर रुंग्णालय आणि जातीय समीकरणे.


आज काल कुठल्याही वादाला जातीय समीकरणाशी जोडून ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण किंवा हिंदू विरुद्ध अहिंदु असा कापोल कल्पित वाद तयार केला जातो आणि त्यात आपण आपापल्या अस्मिता राखण्यासाठी फुकट प्रयत्न करतो.


दीनानाथ मंगेशकर रुंग्णालयातील झालेली दुर्दैवी घटना म्हणजे ब्राह्मण बहुल्य रुंग्णालय प्रशासन असल्यामुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठली जातं आहे आणि त्यांना इतर ब्राह्मण मंडळींनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा काही ब्राह्मण मंडळी करीत आहेत. 


प्रथम येथे स्पष्ट करू इच्छितो की डॉक्टरी व्यवसाय हा एक शिक्षित पेशा असून त्याच्यात काही एथिक्स आणि काही कायदे लागू आहेत. तसेच ते धर्मादाय रुंग्णालय असल्यामुळे त्यांना इतर उत्तरदायित्वे सुद्धा आहेत जीं पार पडल्याची शहानिशा सरकारी आयोग, महिला आयोग आणि पोलीस करीत आहेत. त्यामुळे ही कायद्याची चौकट कोणा विशिष्ट ज्ञातीसाठी तयार झालेली नसून ती त्या व्यवसायातील सर्व व्यक्तींना लागू आहे. जर ते व्यवसायिक दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी आणि ते दोषी नसतील तर ते आपोआप सुटतील. येथे कोण कोणत्या ज्ञातीचा आहे हा प्रश्नच नाही, मीडिया फक्त आगी लावत आहे. 


आणखी एक गोष्ट म्हणजे मंगेशकर रुंग्णालयातील ब्राह्मण डॉक्टर्स, ब्राह्मण समाजातील सर्व डॉक्टर्सचे प्रतिनिधित्व करत नाहीत. डॉक्टरांनी आपली कर्तव्य कायद्याला आणि व्यवसायिक नीतिमत्तेला ( प्रोफेशनल एथिक्स ) धरून पार पाडली असतील तर त्यांना कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. उगाचच जातीय ढोल बडवत बसून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा चुकीचा प्रयत्न करू नये.


माधव भोळे 

ट्रम्प विरुद्ध चीन, एक तर्फे, टारिफ युद्ध आणि तारीफ करण्यास चीन पात्र.

ट्रम्प विरुद्ध चीन, एक तर्फे, टारिफ युद्ध आणि तारीफ करण्यास चीन पात्र.


काल चीन चा CSI 300 शेयर बाजार इंडेक्स ७.३% ने खाली आला तर हॉंगकॉंग चा Hangseng Index १३% नी खाली आला होता परंतु चिनच्या प्रशासनाने व्यापार उदिमाच्या झालेल्या घटीसाठी कमी व्याजदराचे लोन देण्याचे आश्वासन दिल्यामुळे यात थोडी वाढ़ झाली. 


चिनच्या मते अमेरिकेने दोन्ही देशातील व्यापार संबंधात एक तर्फी टारीफ युद्ध छेडले असून चीन अशा प्रकारच्या धमक्याना घाबरत नाही. ती हे मान्य करते की या आधी सुद्धा आमच्यावर असे टारिफ युद्ध लादले गेले परंतु त्यांच्या मते जेव्हडा दबाव तुम्ही आमच्यावर आणाल तेव्हढे आम्ही जास्त सक्षम होऊ आणि आम्ही दबावाखाली झुकणार नाही. 


काय खरोखरचं चीन एव्हडी सक्षम आहे का? की या महापुरात ती डुबून जाणार?


चीन आणि अमेरिका यांच्या मध्ये द्विपक्षीय व्यापार: अमेरिका चीन कडून ४३२.९ बिलीयन डॉलर एव्हडा माल आणि सेवा विकत घेते तर चीन अमेरिकेकडुन १६५.१६ बिलीयन डॉलर माल आणि सेवा विकत घेते. त्या मुळे त्यांच्यात २६७.७४ बिलीयन डॉलर्स एव्हडी तफावत आहे. 


ह्या आकडेवारी वरून ह्या टारीफ युद्धाचा पहिला आणि मोठा फटका अमेरिकेतील गोर गरिबांना बसणार आहे कारण अमेरिकेतील सुपर मार्केट जे चिनकडून विविध गृहपयोगी सामान, अवजारे, जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू, इत्यादी अतिशय स्वस्तात विकत घेतात आणि सेल लावून विकतात त्यावर आता जास्तीतजास्त कर लागल्यामुळे ते महाग होणार आणि त्याचा थेट परिणाम अमेरिकन जीवनमानावर पडणार आहे.

अमेरिकेतील कोणत्याही सुपर मार्केटमध्ये १०० पैकी ७० ते ८०% प्रोडक्ट्स चिनी असतात. 


आधीच ट्रम्पने तेथील सरकारी नोकऱ्यामध्ये कपात केल्यामुळे आणि नंतर ह्या अस्थिर इकोनॉमिचा परिणाम अमेरिकेतील इतर नोकऱ्यांवर होणार असल्यामुळे अमेरिकेत बेकारी आणि महागाई, दोन्ही वाढणार आहे. 


८ मार्च १९७८ ते १७ जून १९८३ ह्या कालावधीत डेंग झियाओपिंग ह्या उदारमत वादी कम्युनिस्ट नेत्याने चीनला माओतसें तुंग च्या कम्युनिस्ट विचारातून बाहेर काढून भांडवलशाहीचा पुरस्कार करत चीनला एक सक्षम उत्पादक देश बनवला आहे. त्यामुळे गेल्या ४७ वर्षात चीन एक अतिशय मजबूत अर्थ व्यवस्था बनली आहे. चीन एव्हडा स्वस्त माल जगात कोणीच देऊ शकत नाही. आपला स्वस्त माल विकून चिनने संपूर्ण जगाला आपल्यावर अवलंबून राहण्यास भाग पाडले आहे. चीन मधील कामगार अतिशय कष्टाळू आहेत, राजकीय व्यवस्था व्यवसायिकांना पूरक आहे, शास्त्रज्ञ् कमीतकमी खर्चात संशोधने करुन नवनवीन शोध लावत असून त्या संशोधनाचा उपयोग चांगली टिकावू आणि स्वस्त उत्पादने करण्यात करत आहेत. त्यामुळे चीनी व्यापार, सर्व सामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत. त्या मुळे चीनला खात्री आहे की आमच्या शिवाय सर्व जगाचे पान अडणार आहे आणि म्हणूनच चीन अमेरिकेच्या दडपशाही विरुद्ध घट्ट पाय रोवून उभा आहे हे नक्की. 


भारताने चीन वर बहिष्कार घालण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला परंतु राष्ट्रीय प्रेम नसल्यामुळे 33 कोटी देवतांसाठी लागणाऱ्या रांगोळी पासून, पणत्या, आकाश कंदील, गणपतीच्या मूर्ती सुद्धा भारतात चीन कडुन येत आहेत. भारतातील १० पैकी ८ मोबाईल चीन बनवते तर मार्केटमध्ये असलेल्या होम अपलायन्सेस मधील ९०% पार्टस चीन कडुन आयात होतात. अगदी, सध्या जे बोगदा खणणारे ड्रीलिंग मशीन सर्वत्र वापरले जातं आहेत ती युरोप किंवा चीन मधील आहेत. आई टी सेवा सोडून सर्वच क्षेत्रात चीन भारतात एक्स्पोर्ट करते. चीन भारताकडून १६.६७ बिलीयन डॉलर चा माल आणि सेवा विकत घेते तर भारत चिनकडुन १०२ बिलीयन डॉलर्स चा माल आणि सेवा विकत घेत आहे या वरून तुम्हांला कळलेच असेल.


माधव भोळे

Sunday, April 6, 2025

Tribhuvan Sahakari University, Anand, Gujarat.

The world's first university on cooperation; Tribhuvan Sahakari University, Anand, Gujarat. 


On 1st April 2025, the central minister of state for cooperation Mr. Murlidhar Mohol declared in Rajyasabha that after passing the bill in Loksabha and Rajyasabha, the government has established "Tribhuvan Sahakari University" as the first national university for studies in Cooperation in India. It is also the first university in the world of similar kind. The present Institute of Rural Management, Anand will be its first college under this university. 

        The Minister said the rural economy will play a major role in realising the goal of making India the third-largest economy in the world in 2047. He said there are eight lakh cooperative institutions that are functional in the country in which over 30 crore people are engaged. He said, this vast number reflects that one member of every farmer’s family is linked with cooperatives. He said that since the inception of the Ministry of Cooperation, several initiatives have been taken to strengthen the cooperative sector in the country. He said the bill will promote cooperative spirit in the country.


The university is named after the Late Gandhian Shri Tribhuvan Patel who has pioneering work done by establishing Amul Dairy along with Technocrat Dr. Kurian Verghese. The university will be available for studies in Cooperation, rural management, cooperative Finance, administration etc. 


In Maharashtra, there is a Vaikuntha Mehta national institute for cooperative management in Pune as well Dr. Vithhalrao Vikhe Patil institute of Cooperative management, Pune.


Madhav Bhole