आरक्षणाची फळे :
२०२४ साली त्यावेळचे सुप्रीम कोर्ट न्यायाधीश आणि आताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांनी एक विचार मांडला की अनुसूचित जाती आणि जमातीमधील आरक्षणाचा विचार करताना क्रिमी लेयर चा निकष सुद्धा लावावा. म्हणजे जरी एखादी व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमातीत जन्म घेतली असेल परंतु त्याचे वार्षिक उत्पन्न क्रिमी लेयर पेक्षा जास्त असेल तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळू नये. या विचारावर अनुसूचित जाती जमातीतील प्रस्थापित मंडळींनी सडकून टीका केली कारण त्यांना आणि त्यांच्या पुढील पिढ्याना त्याचा लाभ मिळणार नाही. प्रस्थापित आधीच मोक्याच्या जागा घेऊन बसले आहेत आणि त्यांना पुढच्या शंभर पिढ्याची काळजी करत आहेत.
काल एका समारंभात गवई साहेबांनी परत त्याचा उच्चार केला आणि आपल्या विधानाला पुष्टी दिली. गवईंच्या मते त्या समाजातील एक अत्यंत श्रीमंत किंवा IAS अधिकारीचे मुल याची पार्श्वभूमी आणि एका गरीब मागास शेतकरीचे मुल याची पार्श्वभूमी ही सारखी नसल्यामुळे गरीब मागास शेतकऱ्यांच्या मुलाला तो लाभ मिळायला हवा.
प्रस्थापितांचे म्हणणे की आरक्षण हे जाती जमातीला मिळाले असून ते आर्थिक मागासलेपणासाठी मिळाले नाही. तर गवई साहेब म्हणतात जों गरजू आहे त्याला प्राधान्य मिळायला हवे.
जेव्हा बाबासाहेबांनी आणि घटना समितीने आरक्षणाचा विचार केला तेव्हा वर्षानुवर्षे वंचित असलेल्या समाजातील मागासलेपणा दूर व्हावा आणि त्यांना इतर समाजाबरोबर सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी घटनेत केलेली ही तरतूद आहे. त्या वेळी जात हा फक्त मागासलेपणाचा एक निकष म्हणून मानला गेला पण मागासलेपणा हा आरक्षणाचा मुख्य कणा आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी त्या आरक्षणाची मर्यादा १० वर्ष ठेवली जेणेकरून हा बॅकलॉग १० वर्षात भरेल अशी माफक अपेक्षा. पुढे वेळोवेळी सभागृहाने ही मर्यादा वाढवली.
ज्या कुटुंबाचा मागासलेपणा गेला आहे त्याचा आरक्षणासाठी विचार करण्यापेक्षा जों अजूनही मागासलेला आहे त्याला आरक्षण मिळायला हवे असा आग्रह गवईसाहेब धरत असतील तर त्यात चूक ते काय? त्यांनी त्या समाजाला आरक्षण देऊ नये किंवा त्यांचा आरक्षणाचा टक्का कमी करावा असे तर म्हटलेनाही ना? पण जों पात्र आहे त्याला प्रथम आरक्षण मिळायला हवे एव्हडेच ते म्हणाले पण त्या मुळे प्रस्थापितांच्या बुडाला आग लागली. मागासले पणा आर्थिक किंवा सामाजिक निकषावर व्हायला हवे. जों सुशिक्षित आहे किंवा जों सधन आहे तो आरक्षणासाठी अपात्र आहे असे त्यांना वाटते. मला वाटते त्यांचे विचार योग्य आहेत. सर्व विचारवंत लोकांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा.
माधव भोळे
No comments:
Post a Comment