Thursday, September 4, 2025

परीक्षेतील यश अपयश!!

 परीक्षेतील यश अपयश!!


गेल्या ५ दिवसात मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. जरांगे आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी अडून बसले होते आणि फडणवीस सरकारचे प्रतिनिधीत्व करीत मंत्रीमंडळाला विश्वासात घेऊन सरकारची बाजू मांडत होते. मुद्धा शेवटी कोर्टात गेला. दोन्ही बाजूला फटकारले गेले. दोन्ही बाजूला काही चुका झाल्या. समाजाकडून, प्रसार माध्यमांकडून, विरोधी पक्षांकडून आणि अस्तनीतील निखऱ्यांकडून दोन्हू बाजुनंवर टीका झाली. पण सरते शेवटी दोन्ही बाजूनी समन्वय साधत एका ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. 


पण टीका तर होणारच. जों समाजासाठी काम करतो त्यावर टीका होणारच. कारण कोणीही बिनचूक नसतो. काही ना काही चुका होणारच. जों काम करतो त्यांच्याच चुका होतात. जों काम करत नाही त्याच्या चुका कशा होतील? 


आहो आपण नोकरीं मध्ये असताना एखादा साधा ड्राफ्ट जरी बनवला तरी त्यात साहेब चुका काढतो. कोणता तरी शब्द बदलतो. इकडचे वाक्य तिकडे करत ड्राफ्टला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते अशा गोष्टींना जास्त मनावर घेऊ नये. काम करणाऱ्याने काम करावे. टीका काराने टिका करावी. शेवटी काम महत्वाचे. त्यासाठी तर आपण नोकरींमध्ये एकत्र आलो असतो. कोण शहाणा याला महत्व नाही.


असो,


माधव भोळे


No comments:

Post a Comment