Sunday, September 20, 2026

ब्राह्मण समाज, एक पंचिंग बॅग

ब्राह्मण समाज, एक पंचिंग बॅग काल आय. आय. टी. मुंबई मधील विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले आणि त्यामुळे मानसिक तणावा मूळे त्याने आत्महत्या केली आणि आज लगेच समाज माध्यमातून चर्चा सुरू झाली की जातीयवादी शक्ती मूळे त्या विध्यार्थ्याने आत्महत्या केली. झालेली गोष्ट अत्यंत दुर्दैवी असून त्या विद्यार्थ्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीं ईश्वरचरणी प्रार्थना. त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. एक ऍडवोकेट म्हणतात २० वर्षात २३ आय आय टी मध्ये १६० विद्यार्थ्यांनी जातीयवादी छळ सहन न झाल्यामुळे आत्महत्या केली. या आत्महत्या नसून या हत्या ब्राह्मणवादी शिक्षण व्यवस्थेमुळेच झाल्या आहेत. आता ब्राह्मणवादी शिक्षण व्यवस्था म्हणायला आय आय टी मध्ये वैदिक किंवा सनातनी शिक्षण तर दिले जात नाही. ना ते संस्कृत मध्ये शिकवले जात. ते तर इंग्रजी मध्ये आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि आता ह्युमानुलीटीज आणि मॅनेजमेंट मध्ये शिकवले जाते. येथे कोठे ब्राह्मणवाद किंवा मनुस्मृती आडवी येते? मुद्धा असा की २३ आय आय टी मध्ये एका वर्षाला १८००० विध्यार्थ्यामध्ये २०% राखीव जागा जातीनिहाय असतात. म्हणजेच दरवर्षी सुमारे ३६००. जरी हिशेबसाठी आपण वर्षाला ३००० x २० वर्ष = ६०,००० जातीनिहाय जागां पैकी फक्त त्यांच्याच आकडेवारी नुसार १६० विध्यार्थ्यानी आत्महत्या केली. अर्थात आत्महत्या करणे दुर्दैवी आहे, परंतु ५९,८४० विद्यार्थ्यांनी तर आत्महत्या केली नाही. मग त्याना नाही ब्राह्मणवादाची अडचण आली? उगाच काहीतरी मुद्धे काढून ब्राह्मणांना दोष द्यायचा. ब्राह्मण समाज हा एक पंचिंग बॅग झाली आहे. कुठे काही बिघडले, की यांना ब्राह्मण आडवे येतात. आज देश स्वतंत्र होऊन ७९ वर्ष झाली तरी ३% ब्राह्मण ९७% इतर समाजाला गुलामगिरीत कसा ठेवू शकतो हे जगातील ९ वे आश्चर्य म्हणावे लागेल. अहो आय आय टी मध्ये असलेले सर्व प्राध्यापक काही ब्राह्मण नसतात. तेथे पण शिक्षण तसेच प्रशासनामध्ये राखीव जागा असतात ज्या जातीनिहाय असतात. सर्व ठिकाणी राजकारण करून देशाचा सत्यानाश करू नका. निदान उच्च शिक्षण संस्थामध्ये, मेरिट ला महत्व ध्या मग तो कोणत्याची समाजाचा असो. माधव भोळे

No comments:

Post a Comment