मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकटातून संधी निर्माण करणे, एक कला
मागे एकदा मोदींना एकाने प्रश्न विचारला होता की विरोधक आपल्यावर शब्दरुपी दगडफेक करत असतात, आपणांस काय वाटते? मोदी म्हणाले की जे दगड ते फेकतात त्याचा जिना बनवून मीं आणखी वरच्या उंचीवर जातो.
काही दिवसापूर्वी, विरोधी पक्षातील कर्तृत्ववान मंडळींना हाताशी धरून ऑपरेशन सिंदूर बद्धल स्पष्टीकरण देण्यासाठी ५० देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याच्या कल्पनेला माझ्यासहित अनेक मंडळींनी विरोध दर्शवला होता परंतु आज मा. खा.शशी थरूर यांच्या पनामा देशातील पत्रकार परिषदेवरुन असे लक्षात येते की तसा विरोध करणारे चूक होते.
पाकिस्तानने केलेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरचे स्पष्टीकरण देण्यासाठी भारताने पाठवलेली शिष्टमंडळे आपले कामा चोख बजावत असून, भारत एक लोकशाही देश आहे आणि भारताबरोबर व्यापार, शिक्षण, कला, संस्कृती इत्यादी विषयात आदान प्रदान करणे हे त्या त्या देशांच्या आणि जगाच्या हिताचे आहे, तसेच भारताने ह्या शिष्टमंडळाचे द्वारे पाकिस्तानची नापाक कर्तृत्व सुद्धा चव्हाट्यावर आणली असून भारताच्या कारवाईला जगभरातून पाठिंबा तयार केला आहे. जर पाकिस्तान ५३ देशांच्या ऑरगॅनायझेशन ऑफ इस्लामिक कंटरीज ( OIC) मध्ये आपली व्यथा मांडत असेल तर भारत जगाच्या पटलावर आपली भूमिका मांडत आहे. हे करत असतानाच ह्या द्वारे विरोधकांची धार सुद्धा बोथट केली जातं आहे.
ह्याला म्हणतात संकटातून संधी निर्माण करणे.
उद्या कदाचित मा. शशी थरूर कुठल्यातरी देशात राजदूत म्हणून नियुक्त झाले तर आश्चर्य वाटायला नको.
माधव भोळे
No comments:
Post a Comment