अश्विनी भिडे, पत्रकार परिषद, सरकारच्या निर्लज्जपणाचा कळस
मेट्रो ३ रेल्वेवरील आचार्य अत्रे मेट्रो स्थानाकात आलेल्या महापुरात स्थानक बुडून गेल्यामुळे फडणवीस आणि शिंदे तसेच सरकारवर टिकेची झोड उठली. त्यातील शंकांचे निराकरण करण्यासाठी मेट्रो प्रकल्पच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौं. अश्विनी भिडे ( IAS 1995 batch) यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांनी स्पष्ट केले की आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन मधील ६ पैकी दोन एक्सिट गेट जवळील कामे अपूर्ण होती. त्यांच्यामते त्या कामाच्या भोवती सौरक्षक भिंत होती परंतु अनपेक्षित पावसामुळे, अपेक्षित अंदाजापेक्षा ( capacity) जास्त पाणी भरल्यामुळे मेट्रो स्टेशन पाण्याने भरले.
हे स्पष्टीकरण तांत्रिक दृष्ट्या जरी योग्य असले तरीसुद्धा काम अपूर्ण असताना आणि योग्य ती काळजीवाहू यंत्रणा स्थिर स्थावर नसताना मेट्रो रेल्वे सुरू करण्याची घाई कशाला या बाबत त्यांच्याकडे समाधान कारक उत्तर नव्हते. नुसते रेल्वे ची ट्रायल सुरक्षित झाली म्हणजे काम झाले का? रेल्वे यंत्रणा आणि रूळ सुरक्षित झाले पण प्रवशांसाठी असलेल्या सुविधा अपूर्ण असतील तर प्रवास करणे सुरक्षित आहे का?
खरे म्हणजे ही सर्व यंत्रणा फायर, फ्लड, दहशदवाद विरुद्ध तसेच अन्य सेफ्टी ऑडिट करून सुरक्षित करे पर्यंत यंत्रणा बंद ठेवावी असे मला वाटते. आपण प्रवाश्यांचा जीवाशी खेळत आहोत या बद्धल अश्विनी ताईंना कोणतीही खंत वाटलेली दिसली नाही.
यथा राजा तथा प्रजा.
माधव भोळे
No comments:
Post a Comment