Wednesday, May 7, 2025

भारतीय सैन्याचे मनःपूर्वक अभिनंदन.

 ७.०५.२५

भारतीय सैन्याचे मनःपूर्वक अभिनंदन.


२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हिंदुविरोधी आतंकवादी कारवाई मध्ये मारल्या गेलेल्या २६ निष्पाप हिंदूंचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्यंत विचारपूर्वक, तोलून मापून, युद्ध कोणतेही उग्र रुप धारण करणार नाही याची काळजी घेत, अचूक हल्ला करुन एकंदर ९ आतंकी गड उध्वस्त केले आणि त्यामध्ये साधारण ७६ आतंकवादी मृत होऊन अनेक जखमी झाले, या कारवाई बद्धल देशाची तिन्ही सशस्त्र दले, भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच विरोधी दल आणि सर्व धर्मातील सच्चे भारतीय नागरिक यांनी भारत सरकारच्या ह्या कारवाईला विनाअट पाठिंबा दिला याबद्दल त्या सर्वांचे आभार.


आज श्रीनगर विमानतळ बंद ठेवला आहे. ज्या पर्यटकांना देशातील सुज्ञ लोक विनवण्या करत होते की युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे आपण पर्यटनास जाऊ नये तरी सुद्धा जे तेथे गेले आहेत, त्यांच्या मुळे तयार होणाऱ्या लष्करी कारवाईतील अडथळ्याना ते स्वतः जबाबदार असून त्यांना उचकवणारे अतुल कुलकर्णी, किरण माने आणि काही लीब्रांडू लोक हे त्यांना वेळ आली तर सुखरूप परत घेऊन येतील अशी आपण आशा करूया त्यामुळे त्यांची काळजी नसावी. 


पंतप्रधान मोदी यांनी बोलें तैसा चाले, मऊ मेणाहून आम्ही विष्णु दास कठीण वज्रास भेदू ऐसे आणि भले जरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी हे आपले शब्द खरे केले असून ये तो बस ट्रेलर है, असली पिक्चर बाकी है, हे पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत समजावून नव्या भारताची ओळख करून दिल्यामुळे संपूर्ण भारतीय जनता त्यांच्या पाठीशी आहे. 


पुन्हा एकदा वरील सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

जय हिंद, भारत माता की जै,


माधव भोळे 


 







No comments:

Post a Comment