"फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष - वीर सावरकर"
आज एक पोस्ट वाचली, ठाणे येथील स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान तर्फे आज २८ मे २०२५ रोजी डॉ. उदय निरगुडकर यांचे सावरकर यांचेवरील व्याख्यान "फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष - वीर सावरकर" असे आयोजित केले आहे.
वि. दा. सावरकर यांचे महात्म्य सांगण्याएव्हडे ज्ञान डॉ. निगुडकर यांचेकडे नक्कीच आहे परंतु व्याख्यानाचा मथळाच मुळी सांगतो की आत्याबाईला मिशा असत्या तर, काका म्हटले असते.
जीं गोष्ट झाली नाही त्या गोष्टी बद्धल एखाद्याला क्रेडिट देणे किंवा त्याने ते काम केले असते असे म्हणणे अयोग्य आहे. जर तेव्हडेच सावरकर ताकदवान असते आणि तेव्हडीच भारताची जनता त्यांच्या पाठीशी असती तर सावरकरांनी फाळणी नक्कीच रोखली असती.
पण तसें नव्हते.
सावरकरांचा पूर्ण आदर राखून नमूद करू इच्छितो की १९३७ साली झालेल्या प्रांतीय निवडणुकामध्ये एकंदर १५८५ जागा पैकी ७११ जागा काँग्रेस, १०६ मुस्लिम लीग, युनियनिस्ट पार्टी १०१ आणि १९१५ साली स्थापन झालेल्या आणि १९३३ साली राजकीय पक्ष म्हणून नोंद झालेल्या हिंदू महासभा आणि सिंध हिंदू सभा या दोन हिंदुत्ववादी पक्षांना मिळून फक्त २१ जागा मिळाल्या होत्या. २७ सप्टेंबर १९२५ साली स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावेळी राजकीय पक्ष म्हणून काम करत नव्हता ( आजही नाही ).
ज्या नेत्याकडे जनमत नाही असा नेता फाळणी रोखू शकला असता असे म्हणणे अवास्तव नाही का? आपल्या नेत्याबद्धल जरूर आदर असावा आणि असायलाच पाहिजे परंतु आकडे बघितल्यावर वास्तव वेगळे दिसते.
फाळणी रोखण्यासाठी नेहरू, वल्लभभाई पटेल, महत्मा गांधी तसेच अन्य नेत्यांनी बरेच प्रयत्न केले परंतु एकसंघ भारत ब्रिटिश महासत्तेला आव्हानत्मक ठरेल म्हणून ब्रिटिशांनी १५० वर्ष धार्मिक विष पेरल्यामुळे मुसलमानांचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याच्या इर्षेमुळे फाळणी शिवाय काँग्रेसला पर्याय राहिला नाही.
मुस्लिम लीगनें समोपचार हा शब्द सोडून बंगाल मधील नोवाखाली मध्ये सुऱ्हावर्दी मुख्यमंत्री असताना वंश शुद्धीकरण सारख्या घातक आणि क्रूर मोहिमा अवलंबल्यामुळे फाळणी स्वीकारणे काँग्रेसला भाग पडले. नेहरू आणि गांधीजींना मान्य नसलेला फाळणीचा प्रस्ताव वल्लभभाई पटेलानी गांधीजींचा विरोध पतकरून काँगेस वर्किंग कमिटी मध्ये मांडला आणि गांधीजींना तो मान्य करायला लावला.
असो. झाले ते चांगले झाले शरीरातील कॅन्सर असलेला भाग काढला गेला आणि स्वतंत्र हिंदुस्थानचा प्रगतीचा मार्ग मोकळा झाला.
काल भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानावर पोहचली ते हेच दर्शवते की त्या वेळेला झालेला फाळणीचा निर्णय योग्यच होता. आपल्या जुन्या नेत्यांबद्दल दुमत असू शकते पण त्यावेळचे आपले नेते नालायक नक्कीच नव्हते.
माधव भोळे
No comments:
Post a Comment