Wednesday, May 15, 2024
खरा शिक्षक
कॉपी पेस्ट
एक तरुण माणूस वृद्ध माणूसाला भेटतो. विचारतो:
"सर तुम्हाला मी आठवतो का?"
आणि वृद्ध नाही म्हणतो. मग तो तरुण त्यांना सांगतो की तो त्यांचा विद्यार्थी होता आणि शिक्षक विचारतात
"तुम्ही काय करता?"
तरुण उत्तर देतो: मी शिक्षक झालो.
"वा! किती चांगले, माझ्यासारखे?" म्हातारा विचारतो.
"होय. खरं तर, मी शिक्षक झालो कारण तुम्ही मला तुमच्यासारखे बनण्याची प्रेरणा दिलीत.”
शिक्षक कुतूहलाने त्या तरुणाला विचारतो की त्याने कोणत्या वेळी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला. आणि तो तरुण त्याला पुढील कथा सांगतो:
“सर, एक दिवस, माझा एक मित्र, जो विद्यार्थी देखील होता, एक छान नवीन घड्याळ घेऊन आला आणि मी ठरवले की मला ते हवे आहे. मी ते त्याच्या खिशातून चोरले.
थोड्या वेळाने, माझ्या मित्राला त्याचे घड्याळ गहाळ असल्याचे लक्षात आले आणि त्याने लगेच आमच्या शिक्षकाकडे म्हणजेच तुमच्याकडे तक्रार केली.
मग तुम्ही वर्गाला उद्देशून म्हणालात, ‘आज वर्ग सुरू असताना या विद्यार्थ्याचे घड्याळ चोरीला गेले. कोणी चोरले असेल तर ते परत करा.''
मला ते हवे होते म्हणून मी ते परत केले नाही.
तुम्ही दार बंद करून आम्हा सर्वांना वर्तुळकार उभे राहण्यास सांगितले. घड्याळ सापडेपर्यंत तुम्ही एक एक करून आमचे खिसे शोधणार होता.
तथापि, तुम्ही आम्हाला डोळे बंद करण्यास सांगितलेत कारण आम्ही सर्वांनी डोळे मिटले तरच तुम्ही त्याचे घड्याळ पहाल अशी अट ठेवली.
आम्ही सूचना केल्याप्रमाणे केले.
तुम्ही प्रत्येकाचा खिसा तपासला आणि माझ्या खिशात तुम्हांला ते घड्याळ सापडले. तरीसुद्धा तुम्ही सर्वांचे खिसे शोधत राहिलात आणि नंतर सर्वांचे खिसे पूर्ण तपासून झाल्यावर म्हणालात, 'डोळे उघडा. घड्याळ सापडले आहे.’’
तुम्ही मला सांगितले नाहीत आणि घडलेल्या गोष्टीचा कोणाला उल्लेखही केला नाहीत. घड्याळ कोणी चोरले हे तुम्ही कधीच सांगितले नाही. तो माझ्या आयुष्यातील सर्वात लाजिरवाणा दिवस होता. त्या दिवशी तुम्ही माझी प्रतिष्ठा कायमची वाचवलीत.
पण हाच तो दिवस आहे की मी चोर, वाईट व्यक्ती वगैरे न बनण्याचा निर्णय घेतला. तुम्ही कधीच काही बोलला नाहीत, किंवा तू मला ओरडला नाहीत किंवा मला नैतिकतेचा धडा देण्यासाठी मला बाजूला नेले नाहीत.
मला तुमचा संदेश स्पष्टपणे मिळाला.
तुमचे आभार, मला समजले की खऱ्या शिक्षकाने काय केले पाहिजे.
प्रोफेसर, तुम्हाला हा भाग आठवतो का?
वृद्ध प्राध्यापकाने उत्तर दिले, 'हो, मला चोरीच्या घड्याळाची परिस्थिती आठवते, जे मी प्रत्येकाच्या खिशात शोधत होतो. पण मला हे कधीच कळले नाही की तू ते घड्याळ चोरले होते. कारण खिसे तपासताना मी सुद्धा डोळे मिटले.
हेच तर शिकवण्याचे सार आहे:
एखाद्याला सुधाराचे असेल तर त्याला अपमानित केले पाहिजे असे नाही; तुम्हांला कसे शिकवायचे ते माहित आहे म्हणून तुम्ही योग्य वागलात.
लेखक अज्ञात
आत्मनिर्भय भारत आणि ५ ट्रिलीयन इकॉनॉमी!
आत्मनिर्भय भारत आणि ५ ट्रिलीयन इकॉनॉमी!
कळवण्यास वाईट वाटते की नुकत्याच संपलेल्या वर्षात भारताने चीनला फक्त १६.६७ बिलीयन डॉलर्सचा एक्स्पोर्ट केला तर चिनने भारताला १०२ बिलीयन डॉलर्सचा माल निर्यात केला.
या उलट
अमेरिकेने भारताला ४०.८ बिलीयन डॉलर्स ची निर्यात केली तर भारताने अमेरिकेला ७७.५ बिलीयन डॉलर्स ची निर्यात केली.
भारताचा अमेरिकेबरोबरील निर्यातीपैकी मोठा हिस्सा सॉफ्टवेअर एक्स्पोर्ट आहे, तर चिनचा भारताबरोबरील निर्यातीतील मोठा हिस्सा केमिकलं, फर्टीलायझर आणि इतर manufacturing आहे.
गड्यानो ३.५७ ट्रिलीयन इकॉनॉमीचा अर्थ ३.५७ ट्रिलीयन चे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टस आणि सर्व्हिसेस. पण हे आपण तयार केलेली प्रॉडक्टस आणि सर्व्हिसेस, आपल्या जास्तीच्या लोकसंख्येमुळे आपणच हजम करत आहोत.
जे काही बनवले जाते त्यातील थोडेच एक्स्पोर्ट होते आणि बाकी सर्व हजम केले जाते.
आता कळले का की परदेशीं कंपन्या भारतात का ठाण मांडून बसतात तें? कारण येथे सर्व प्रकारच्या वस्तुंना खूप मोठी मागणी आणि बाजारपेठ आहे.
माधव भोळे
जे पेराल तें उगवते 👍
जे पेराल तें उगवते 👍
१८९२ साली अमेरिकेतील स्टॅन्फॉर्ड विद्यापीठात २ विध्यार्थी गरिबीमुळे फी भरण्यास असमर्थ होते, पण त्यांना अडचण होती फी साठी पैसे कोणाकडे मागायचे?
शेवटी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी ठरवले की कॉलेज कॅम्पसवर एक संगीत रजनी घडवून आणू. त्यावेळचा अमेरिकेतील प्रसिद्ध पियानो वादक जे. पादेरवसकी यांच्याकडे तें गेले. त्याच्या मॅनेजरने सांगितले २००० डॉलर्स ऍडव्हान्स लागेल. तें म्हणाले ठीक आहे. त्यांनी संगीत रजनीची तयारी सुरु केली पण कार्यक्रमाच्या २ दिवस आधीपर्यंत फक्त १६०० डॉलर्स ची तिकिटे विकली. आता मोठी अडचण आली.
तें दोघे पादेरवसकीकडे गेले आणि सत्य परिस्थिती सांगितली आणि त्याला १६०० डॉलर्स रोख अधिक ४०० डॉलर्स चा २ महिन्यानंतरचा चेक सुपूर्द केला.
पादेरवसकीने तो चेक फाडून टाकला आणि १६०० डॉलर्स परत दिले. म्हणाला आतापर्यंत तुमचा जेव्हडा खर्च झाला असेल तेव्हडा खर्च अधिक तुमची फी काढून जेव्हडे पैसे उरतील तेव्हढे मला द्या. मला चालेल. ठरल्यावेळी संगीत रजनी पार पडली.
काही वर्षांनी पुढे पादेरवसकी पोलंड ह्या देशाचा पंतप्रधान झाला. त्याने देशासाठी खूप चांगले काम केले, परंतु दुसऱ्या महायुद्धात पोलन्डची वाताहत झाली. युद्धामुळे १५ लाख लोकांवर उपासमारीची पाळी आली आणि त्यांना खाऊ घालायला देशाकडे पैसे नव्हते. पंतप्रधान पादेरवसकीने जगभरात अन्न धान्य आणि निधीची याचना केली. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष हर्बर्ट हुवर होते. त्यांनी त्या आवाहनला प्रतिसाद देऊन बोटी भरभरून अन्नधान्य पोलंडला पाठवले आणि १५ लाख लोकांची उपासमार टळली.
पुढे पादेरवसकी अमेरिकेच्या अध्यक्षाना भेटायला स्वतः अमेरिकेत गेले आणि त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यावर अध्यक्ष हुवर म्हणाले, तुम्हांला आभार मानण्याचे काहीच कारण नाही. तुम्हांला आठवत असेल, काही वर्षा पूर्वी स्टॅन्फॉर्ड मधील दोन युवक तुमच्याकडे संगीत रजनीसाठी आले होते आणि तुम्ही त्यांना मदत केलीत? त्या दोन पैकी मी एक होतो ज्याला तुमच्या औदार्याचे दर्शन घडले आहे. त्याची ही फुल न फुलांची पाकळी परत केली समजा.
बघा कसा योगायोग आहे तो. जग सुंदर आहे. जे पेरले तेच उगवते. वेळप्रसंगी तुम्ही दुसऱ्याला निस्वार्थी बुद्धीने मदत करा. जे दिलेत तें कोणत्याही स्वरूपात परत येऊ शकते.
कॉपी पेस्ट
मूळ इंग्रजी कथा
भाषांतर माधव भोळे
चिमूटभर साखर.
चिमूटभर साखर.
( आयुष्यातील फार महत्वाची गोष्ट!!)
आपण सर्व सुशिक्षित, उच्चशिक्षित मंडळी, जेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करतो किंवा एका कार्यपद्धतीतुन दुसऱ्या कार्यपद्धतीत ( रोल ) जातो, किंवा ऑफिसमध्ये प्रमोशन होऊन नवीन ब्रांचला जातो वगैरे, त्यावेळी आपल्यापैकी अनेकांना अनेक अडचणी येतात. कारण आपली प्रत्येक विषयात काही ठाम मते किंवा पूर्व ग्रह असतात.
कधी नवीन ऑफिसची कार्यपद्धती पटत नाही ( जुनेच ऑफिस बरे वाटते ), कधी नवीन हौसिंग सोसायटी किंवा राहण्याचा विभाग आवडत नाही, कधी नवीन संस्थेत काम करायला गेलो तर तेथे तेथील मंडळींबरोबर जुळवून घेणे जड जाते तर कधी सासरी गेलेल्या वधूला सासरच्या माणसांबद्धल अडचणी असतात. एक ना अनेक.
पण या ठिकाणी एक जुनी ऐतिहासिक गोष्ट बोध घेण्यासारखी आहे ती लिहावीशी वाटते.
साधारण ७ व्या शतकातील गोष्ट. ज्या वेळी अरब लोकांच्या आक्रमाणामुळे आणि जाचामुळे पारशी मंडळी पर्शिया सोडून दूर अशा संजाण, गुजरातच्या हिंदूराजा राणा जडी यांच्याकडे आली आणि त्याला म्हणाली की आम्हाला तुझ्या राज्यात आश्रय दे, त्यावेळी त्याने एक दुधाने भरलेली वाटी त्या पारशी मंडळीसमोर ठेवली आणि म्हणाला, जशी ही वाटी भरलेली आहे तसेच माझे राज्य सुद्धा भरलेले आहे त्यामुळे तुम्हाला स्वीकारण्यासाठी माझ्या राज्यात जागा नाही.
त्यावर त्या पारशी मंडळीच्या प्रमुखांने एक चिमूटभर साखर मागितली आणि ती त्या दुधाने भरलेल्या वाटीत मिसळली आणि म्हणाला की जसे तुमच्या ह्या दुधाची गोडी साखरेने वाढवली तशी तुमच्या राज्याची शान बनून आम्ही राहू. आमच्यापासून कोणलाही त्रास होणार नाही.
आज पारशी समाज हा भारतातील एक अतिशय पुढरलेला, श्रीमंत समाज आहे. भारताच्या लोकसंख्येच्या फक्त ०.००००५ % एव्हडा असून भारताच्या जिडीपी मध्ये त्यांच्या उद्योगधंद्याचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या धर्मादाय संस्था खूप मोठे काम करतात.
यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. जेथे जाल तेथले व्हा. तेथे मिसळून जा. म्हणतात ना पाण्यासारखे पारदर्शी व्हा.!
पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दे हो जाये वैसा!
( अर्थात ही गोष्ट दुर्जंनांच्या संगतीत लागू होत नाही )
माधव भोळे
Thursday, May 2, 2024
संगते संग दोषानते
कॉपी पेस्ट
संगते संग दोषानते
एक शेतकरी होता, ज्याने उत्कृष्ट दर्जाचा मका पिकवला. दरवर्षी प्रमाणे त्याला सर्वोत्तम पिकवलेल्या मक्याचा पुरस्कार मिळाला. एका वर्षी एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली आणि त्यांनी कशी प्रगती केली याबद्दल एक गोष्ट त्यांना समजली, की शेतकऱ्याने त्याचे बियाणे त्याच्या शेजाऱ्यांसोबत वाटले.
"तुमच्या शेजाऱ्यांबरोबर दरवर्षी तुम्ही स्पर्धा करत असताना तुमचे सर्वोत्तम मक्याचे बियाणे त्यांना वाटणे तुम्हाला कसे परवडते?" पत्रकाराने विचारले.
का सर,” शेतकरी म्हणाला, “तुम्हाला माहीत नाही का? वारा पिकलेल्या मक्याचे परागकण उचलतो आणि ते शेतातून दुसऱ्या शेतात फिरवतो. माझ्या शेजारी निकृष्ट मका पिकवल्यास, क्रॉस-परागीकरणामुळे माझ्या मक्याची गुणवत्ता सतत खराब होईल. जर मला चांगला मका पिकवायचा असेल, तर मी माझ्या शेजाऱ्यांना चांगला मका पिकविण्यात मदत केली पाहिजे.
आपल्या जीवनाबाबतही असेच आहे... ज्यांना अर्थपूर्ण आणि चांगले जगायचे आहे त्यांनी इतरांचे जीवन समृद्ध करण्यास मदत केली पाहिजे, कारण जीवनाचे मूल्य ते ज्या जीवनाला स्पर्श करते त्यावरून मोजले जाते. आणि जे आनंदी राहणे निवडतात त्यांनी इतरांना आनंद शोधण्यात मदत केली पाहिजे, कारण प्रत्येकाचे कल्याण सर्वांच्या कल्याणाशी जोडलेले आहे.
India's Entrepreneurial Journey book reviw
कॉपी पेस्ट prashant joshi
एक वाचक श्री प्रशांत जोशी यांनी लिहिलेला माझ्या पुस्तकाचे परीक्षण
"India's Entrepreneurial Journey"
India's Entrepreneurial Journey हे श्री माधव भोळे लिखित पुस्तक नुकतच वाचनात आले. भारतातील ५१ उद्योगपतींची यात संकलित माहिती आहे. सर्व उद्योगपतींची माहिती वाचनीय, मनोरंजक व अचंबित करणारी आहे. शून्यातून आपल्या कर्तृत्वाने, हुशारीने, निर्णय क्षमतेने त्यांनी केलेली उद्योग भरारी वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. या निवडक ५१ उद्योगपती मध्ये MRF , HDFC, इन्फोसिस, निरमा, रिलायन्स, लिज्जत पापड, झिरोदा, पतंजली या सारख्या वेगवेगळ्या उद्योग जगता बरोबरच नॅचरलस आईस्क्रीम चे श्री रघुनंदन कामथ, पितांबरीचे श्री रवींद्र प्रभुदेसाई, पर्सिस्टंट सिस्टीम चे डॉ आनंद देशपांडे यांचं कर्तृत्व वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. श्री माधव भोळे यांनी प्रत्येकाची मोजकीच पण उल्लेखनीय माहिती अत्यंत रोचक पणे या पुस्तकात मांडली आहे. न्हावी असलेला रमेश बाबू व त्याचा जगातील सर्व महागड्या गाड्या सहित असलेला ट्रॅव्हल व्यवसाय चक्रावून टाकतो.
सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचा. प्रत्येक तरुणाने हे पुस्तक जरूर वाचावे जेणे करून त्याला आपल्या कर्तृत्वाची दिशा ठरविण्यास मदत होईल.
ज्यांना पुस्तक हवे आहे त्यांनी कृपया श्री माधव भोळे (madhavbhole99@gmail.com) यांचेशी संपर्क साधावा.
Prashant Joshi
शैक्षणिक कर्ज, एक अमूल्य सामाजिक सुविधा.
शैक्षणिक कर्ज, एक अमूल्य सामाजिक सुविधा.
काल आमच्या मालाड मधील दादासाहेब भेटले होते. ते कुठल्याशा शैक्षणिक संस्थेत काम करतात. म्हणत होते की माझ्या ओळखीमध्ये कोणीतरी संस्थेकडून शिक्षणासाठी कर्जाऊ पैसे घेतले आहेत. गेले ८ वर्ष झाली पण अजून पूर्णफेड केलेली नाही. तर मी त्यांच्याशी परतफेडी बद्दल बोलावे.
त्यांच्या माझ्यात झालेला सव्वाद खालील प्रमाणे :
मी: तुम्ही कर्ज देताना काही करारनामा करता का?
ते: हो.
मी: बँक कर्ज देताना काही तारण घेते तर तुम्ही काय तारण घेता?
ते: आम्ही तारण घेत नाही पण दोन किंवा तीन शिफारसकर्ते यांची शिफारस घेतो.
मी : तुम्ही व्याज घेता का?
ते : व्याज घेत नाही
मी: परत फेडीला काही मुदत असते का?
ते: शिक्षण पूर्ण झाल्या पासून ५ वर्ष.
मी: जर ५ वर्षात परत फेड झाली नाहीतर त्या नंतर व्याज लावतात का?
ते: त्या ५ वर्षानंतर व्याज घेण्याची तरतूद त्या करार पत्रात आहे.
मी: जर परतफेड होत नसेल तर तुम्ही काय करता.
ते: आम्ही कर्ज फेडिसंबंधि पत्र आणि स्मरण पत्र पाठवतो.
मी: कोणत्या पत्यावर?
ते: त्याच्या मूळ पत्यावर, ज्या वेळी तो शिक्षण घेत होता. पण बरेच वेळा नंतर पत्ते बदललेले असतात आणि विध्यार्थी नवीन पत्ता कळवत नाहीत. दिलेले फोन नंबर सुद्धा बदलेले असतात.
मी: मग तुम्ही काय करता?
ते : त्या विद्यार्थ्यांच्या ओळखीतील माणसांकडुन त्याचा नवीन पत्ता घेतो. कधी कधी मिळतो, कधी कधी मिळत सुद्धा नाही.
मी: बरे ज्यांना हे पत्र मिळते ते ताबडतोक परत फेड करतात का?
ते: कर्ज घेताना त्यांची प्राथमिकता शिक्षण असते त्यामुळे ते सर्व अटी मान्य करून कर्ज घेतात. काही चांगली मुले आणि चांगली कुटुंबे, कर्ज परत फेड आपले इती कर्तव्य समजून लवकर परत फेड करतात, पण काही विध्यार्थ्यांची कर्ज परत फेड करण्याची ईच्छा शक्ती कमी असते. वेळ येते तस तसे त्यांची आयुष्याची प्राथमिकता बदलते असे दिसते. कधी नोकरीं मिळाली नाही, मिळाली तर ती पर्मनंट नाही, जागा विकत घ्यायची असते, लग्न झालेले असते, मूल झालेले असते त्या मुळे परत फेड शक्य होत नाही असे सांगून वेळ मारून नेतात. कधी कधी तर चार चाकी किंवा बंगला घेतात आणि शैक्षणिक कर्ज टांगून ठेवतात.
मी: मग अशा मुलांना तुम्ही कर्ज का देता?
ते: ही संस्था सामाजिक आहे. समाज आणि त्यातील मंडळी चांगली आहेत या चांगुलपणावर विश्वास असलेली मंडळी देणग्या देतात, त्या पैशातून त्याच भावनेने संस्था विद्यार्थ्यांना परत फेडीच्या अटीवर कर्ज देते.
मी: पूर्वी असे कधी होत असे का?
ते: हो. पण बरेच विध्यार्थी पैसे परत करीत. आता न देण्याचे प्रमाण वाढले आहे किंवा खूप उशीर करतात.
मी: मग तुम्ही काय उपाययोजना करता?
ते : त्या विध्यार्थ्यांच्या शिफारस कर्त्याना सांगून बघतो. कधी कधी परिणाम होतो, कधी कधी होत नाही.
मी: मग एव्हडा सर्व खटाटोप करायला खूप वेळ आणि पैसा लागतो तो वेळ कोण खर्च करतो? आणि तुमच्यापुढे हे काम कोण करणार?
ते: आपण आपले कर्तव्य करत राहायचे. बाकी परमेश्वर बघून घेईल.
मी: पण संस्था म्हणून तुम्ही काही स्ट्रातिजी आखली असेल ना? कारण मी असे ऐकले आहे की याच कारणास्तव बऱ्याच ब्राह्मण संस्थानी शैक्षणिक कर्ज देणे बंद केले आहे. शिवाय हल्ली बँका सुद्धा कर्ज देतात.
ते: मग ते आपली सामाजिक बांधिलकी म्हणून काय करतात?
मी: ते शैक्षणिक शिष्यवृत्ती देतात पण ती परत फेडीची नसते, कारण त्यांचे म्हणणे आहे की समाजात देणगीदार भरपूर आहेत, पण सामाजिक काम करायला कार्यकर्ते कमी आहेत. असले तरी, असली किचकट कामे करायची त्यांची तयाऱी नाही. त्यांच्या मते नवनवीन विध्यार्थी कर्ज घेत राहणार, त्यातील काही परतफेड करणार, काही नाही. मग हे चक्र असेच चालू राहणार. ते याला थँकलेस जॉब म्हणतात. त्यांच्यामते आजकालच्या काळात कर्ज दिल्या नंतर त्याची जाणीव तर राहुंध्या उलट ती वसुल करते वेळी वाईटपणाच येतो.
ते: तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण जी जुनी दिलेली कर्जे ती सुद्धा अजून पूर्ण वसुल होत नाहीत. अडचण अशी आहे, ही सुविधा खूप चांगली आहे पण म्हणतात ना एखादा नासका कांदा सर्व कांदे खराब करतो किंवा एखादा घाणेरडा मासा पूर्ण तलाव खराब करतो.
मी: हो, जर सर्व मंडळींनी आपआपली कर्जे वेळेवर परत केली असती तर हा प्रश्नच नव्हता पण तसे होत नाही मग दुसरी काही उपाययोजना करावी लागते. नाहीतर आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते अशी परिस्थिती उद्भवायला नको.
ते: तुमचे म्हणणे मी आमच्या विश्वसतांच्या कानावर घालीन, बघूया ते काय म्हणतात ते.
मी : तुम्ही सांगितलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना मी बोलून बघतो पण ते विचारतील की हा व्यवहार आम्ही आणि त्या संस्थेमधील आहे, तो त्यांनी तुम्हाला का सांगितला, तर काय सांगू? उलटा चोर कोतवाल को डाटे!!
ते: त्यांनी त्यांचा संस्थेशी असलेला व्यवहार नीट केला नाही म्हणून ही सांगायची वेळ आली असे मी म्हटले म्हणून सांगा.
मी: ठीक आहे, तुमच्या सदकार्याला माझा विनम्र नमस्कार आणि देव त्या सर्व कर्जदारांना वेळेवर परतफेड करण्याची बुद्धी देवो हीच प्रार्थना.
माधव भोळे
Subscribe to:
Posts (Atom)