Wednesday, October 15, 2025

मनाचे श्लोक आणि देऊळ बंद २

मनाचे श्लोक आणि देऊळ बंद २


काल मनाचे श्लोक हा सिनेमा बंद पाडल्या नंतर देऊळ बंद २ ह्या सिनेमाचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय त्याच्या निर्मात्याने घेतला. 


 सनातन धर्म आणि भारतीय संस्कृती याची खिल्ली उडवण्याची, सो कॉल्ड पुरोगामी मंडळीनची, जणु स्पर्धाच लागली आहे.


या आधी कोणत्याही परधर्मीयांनी आपल्या स्वतःच्या धर्माविरुद्ध काही सिनेमा किंवा नाटक प्रदर्शित केलेले आठवते का? त्यांच्या देवाची खिल्ली उडवली तर कधी कोणी गप्प बसले आहे का? गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु गोविंदसिंग, अल्ल्हा किंवा येशू ख्रिस्त यांची खिल्ली उडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांचा समाज कधी गप्प बसला आहे का? मग सहनशिलतेचा ठेका, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ठेका फक्त सनातनी हिंदुनीच घेतला आहे का? 


ज्या संविधानाचा आधार घेत ही मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डांगोरा पिटतात त्या संविधानाचे "सर्व धर्म समभाव" हे मूलभूत तत्व ते सोईस्कर विसरतात आणि त्या मुळे लोक कायदा हेतात घेतात. कायदा हातात घेणे गैर आहे पण न्यूटन च्या नियमानुसार ऍक्शन ला रिऍक्शन असतेच हा सृष्टीचा नियम आहे.


लोक सिनेमा आणि सिनेकलाकारांना आदर्श मानतात. त्या आपल्या इमेजचा उपयोग ते जाहिराती करून पैसे कमावण्यात करतात, त्या मुळे कोणत्याही धर्माविरुद्ध टीका, टिपण्णी होईल असे कृत्य न घडावे याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच आहे. 


माधव भोळे 

No comments:

Post a Comment