स्वप्न !!
आज एक लेख वाचत होतो, त्याचे शीर्षक होते "मुंबईमध्ये १ लाख मराठी फेरीवाले दिसायला हवेत". या आधी वडापाव / झुणका भाकर केंद्रे आणि नारळ विक्री मराठी माणसाची असायला हवीत असे स्वप्न एका मोठ्या नेत्याने पाहिले होते.
स्वप्नच पाहायची असतील तर मोठी स्वप्न बघायला हवीत. वसई, पुणे, सांगली, औरंगाबाद आणि इतर महाराष्ट्रातील निदान २५% उत्पादक मराठी असायला हवेत.
मराठी शेतकऱ्यांचे स्वतःचे मार्केटिंग फेडरेशन हवे.
मुबलक किनारा लाभलेला महाराष्ट्र मत्स्योत्पादनामध्ये निदान २ नंबरवर असायला हवा.
महाराष्ट्रातून एक्स्पोर्ट होणारा कारगो आणि कंटेनर मालात महाराष्ट्रीय उत्पादनाची भागीदारी निदान २५% असायला हवी.
फेरीवाले बनून आयुष्यभर मराठी माणसाने रस्त्यावरच काढावे का? म्हणजे परप्रांतीय मोठमोठ्या टॉवर मध्ये येऊन राहणार आणि त्यांना रस्त्यावरील मराठी फेरीवाले सर्व्हिस देणार? काय पण स्वप्न?😰
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, "Having low aim is crime, failure is not".
माधव भोळे
No comments:
Post a Comment