Thursday, October 2, 2025

भारत विरोधी शक्ती!!

भारत विरोधी शक्ती!!


भारताला खिळखिळे करण्याचे काम देश विघातक शक्ती, अंतर्गत शत्रू आणि बाह्य शत्रू सातत्याने करत असतात.


देशाच्या प्रत्येक भागात धर्म विरुद्ध धर्म, जाती विरुद्ध जाती, सनातनी विरुद्ध पुरोगामी, राज्य विरुद्ध राज्ये संघर्ष सुरूच आहे. रस्ता रोको, आंदोलने, बंद याच्या नावाखाली दंगा फसाद आणि तोडफोड सुरूच आहे. 


उत्तर प्रदेश मध्ये सुरू झालेली I Love Mohammed ही अशीच एक चळवळ. तिचे पडसाद देशभर उमटायला लागले. आज अहिल्यानगर मध्ये कोणी समाजविघातक शक्तींनी रस्त्यावर "I love Mohammed " लिहून जाणून बुजून वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिवर्तन दगडफेक आणि लाठी चार्ज होण्यात झाले. 


आरक्षणाच्या निमित्ताने मोर्चा काढणे, शक्ती प्रदर्शन करणे आणि स्थानिक व्यवहार आणि प्रशासन ठप्प करणे हा तर जन्म सिद्ध हक्कच झाला आहे. बरे एकाची मागणी मान्य झाली कीं लगेच चेन रिऍक्शन प्रमाणे दुसऱ्याची सुरवात झालेली असते. कोणतेही सरकार किती पूर्ण पडणार? 


शेतकरी जेव्हा उत्पादन जास्त होते तेव्हा शेतमालाला वाढीव भाव मिळावा म्हणून रस्त्यावर दूध ओतून आणि भाजीपाला फेकून त्या अन्नाचा अपमान करतात, हे चुकीचच आहे.


कधी कबुतरांसाठी कोणी जैन मुनी शस्त्र हातात घेण्याचे म्हणतो तर कोणी महाराज हिंदूंचा टक्का वाढण्यासाठी १० मुले जन्माला घालावी असे म्हणतो. सर्व बाजूनी टाळ्या वाजवायला लोक तयार आहेत. न सिद्ध झालेल्या वोटचोरी च्या नावाखाली तरुणांची माथी भडकवली जातात. सारासार विचार आणि विधिनिषेध काहीच राहिलेला नाही. 


माझी ही कृती देशप्रेमी आहे कीं देश विघातक आहे याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. लाखो करोडो हात कामाचे तास वाया घालवत आहेत. काही तरी उदर निर्वाहाचे काम सोडून आंदोलने, मोर्चे, दंगे फसाद हेच काम राहिले आहे कारण मोफत तांदूळ, रेशन, औषधोपचार, विमा देऊन सरकार लोकांना आळशी बनवत आहे. 


आणि तुम्हांला माहितीच आहे कीं Empty mind is the devil. 


कोण हे नेते जे हे सर्व करायला लावतात?. कोण करतय हे काम? काही मुठीभर लोक वेगवेगळे निमित्त काढून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. राजकारणी लोक आपल्या फायद्यासाठी अशा लढाया सुरूच ठेवत असतात. लोकशाहीचा अतिरेक सुरू आहे आणि शासन याचे नियंत्रण करण्यात कमी पडत आहे. 


सरकारने आणि प्रशासनाने या पाठी असलेल्या विघातक शक्तीना वज्र मूष्टीने चिरडून टाकायला हवे मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, कारण त्यांचा मूळ उद्धेश धार्मिक किंवा सामाजिक नसून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा आहे.


एक वेळ बाहेरचा शत्रू परवडतो पण घरातील शत्रू नाही परवडत.


माधव भोळे 

No comments:

Post a Comment