तंजावरचे मराठा साम्राज्य.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजी महाराज अनेक वर्ष कधी विजापूर दरबारीं तर कधी निजाम दरबारीं एक प्रमुख सरदार म्हणून नोकरीं करीत असत. त्यांना ३ पत्नी होत्या, त्यातील प्रथम पत्नी जिजाबाई साहेब ( माहेरच्या जाधव ), द्वितीय पत्नी तुकाबाई ( माहेरच्या मोहिते ) आणि तृतीय पत्नी नरसाबाई. शहाजी राज्यांकडे पुणे आणि बंगलोर अशा दोन जहागिऱ्या होत्या. पैकी पुणे जहागिरी जिजाऊ माता सांभाळत तर बंगलोरची जहागिरी तुकाबाई सांभाळत.
शहाजी राज्यांना जिजाऊ पासून छत्रपती शिवाजी आणि संभाजी असे दोन पुत्र झाले तर तुकाबाई पासून व्यंकोजी ( एकोजी १ ) पुत्र झाला आणि नसराबाई कर्नाटकी होत्या त्यांना संताजी आणि कोयाजी अशी दोन मूले होती. संभाजी शहाजी भोसले आपल्या वडिलांबरोबर असत आणि त्यांनी विजापूरच्या आदिलशाही मध्ये सरदारकी केली.
शहाजीराजे स्वारी निमित्त जास्तकरून बंगलोर वास्तव्यात तुकाबाई बरोबर रहात असत. पुढे शहाजीराज्यांचे एक पुत्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी विजापूरच्या बादशहाकडे नोकरीं करत असताना स्वपराक्रमावर दक्षिण भारतातील तंजावर येथे ५ मार्च १६७६ रोजी दक्षिणेतील स्वतंत्र मराठी राज्य स्थापन केले. शहाजी राजे यांच्या शेवटच्या काळात नसराबाई त्यांचे जवळ रहात असल्यामुळे बंगलोर जाहगिरी नसराबाईंच्या ताब्यात गेली.
पुढे १६७६ ते १६७८ मध्ये छत्रपती शिवाजी राज्यांनी दक्षिण दिग्विजय स्वारी करताना आपले सावत्र बंधू संताजी ( नसराबाईंचे सुपुत्र ) यांच्या साहाय्याने मद्रास ( चेन्नई ) जवळील वेलोर आणि जवळील जिंजीचा किल्ला जिंकून दक्षिणेत आपला दरारा वाढवला. त्यानंतर त्यांनी दोन्ही ठिकाणी आपले प्रशासक नेमले. ह्या स्वारीमुळे छत्रपतींच्या ताब्यात त्या विभागातील ७२ डोंगर आणि १४ किल्ले आले.
ह्या स्वारीमध्ये त्यांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजी महाराजांची तंजावर येथे भेट घेतली आणि त्यांना स्वराज्याच्या मोहिमेत सामील होण्याची विनंती केली तसेच त्यांच्या वडिलांच्या सामायिक मालमत्तेबद्दल विभागणी करण्याची मागणी केली, परंतु व्यंकोजीनी त्या दोन्ही गोष्टीकडे दुर्लक्ष केले.
आज त्या तंजावरच्या मराठा राजवाड्यात काही भागात भेट देण्याची संधी मिळाली. त्याची काही क्षणचित्रे.
माधव भोळे
No comments:
Post a Comment