Sunday, August 31, 2025

विश्वासाचा पाया - २

 विश्वासाचा पाया - २

पूर्वी मीं या ग्रुप मध्ये मीं एक पोस्ट टाकली होती "विश्वासाचा पाया" त्यामध्ये सर्व प्रथम लिहिले होते
Never over commit.: जर आपल्याला एखादी गोष्ट जमणार नसेल तर आधीच सांगा.

काल  चिनार मैदान,डोंबिवली ( प ) येथील येथील आंनदी कला केंद्राचा मूर्तिकार गणपती उत्सवाच्या आधी दोन दिवस पळून गेला आहे. त्यांनी कुवतीपेक्षा जास्त मूर्ती करायला घेतल्या आणि उद्या गणेश चतुर्थी आली आणि अजून अनेक मूर्ती अपूर्ण होत्या, काही मूर्तिचे रंग अर्धवट झाले होते. त्यामुळे ग्राहकांना तोंड दाखवले तर ते मारतील ह्या भीतीने तो पळून गेला असावा. त्याचा परिणाम म्हणजे ज्या लोकांना हे समजले ते मिळतील त्या मुर्त्या घरी घेऊन गेले आणि शेकडो भक्तांना मूर्ती मिळाल्या नाहीत. सर्वकडे गोंधळ आणि बोंबाबोंब झाली आहे.

अशीच गोष्ट पुणे येथील एका उद्योजिकेला दररोज २०० किलो खवललेले खोबरे लागते म्हणून जाहिरात दिली होती. त्याप्रमाणे दुसऱ्या बाईंनी २ दिवस पुरवठा केला आणि तिसरे दिवशी पासून मोबाईल स्विच ऑफ करून बसली. त्या मुळे त्या उद्योजकेच्या व्यवहारात नक्कीच अडचण आली.

या उलट गिरगावातील देशमुखलेन मधील नाना जोशी कॅटरर यांचे वडील. जवळजवळ ५० वर्षा पूर्वीची गोष्ट. एका विवाहमध्ये त्यांनी आयस्क्रीमची ऑर्डर घेतली होती. त्यावेळी विवाहामध्ये आयस्क्रीम म्हणजे अप्रूप होते. त्यावेळी वरळी वरून आयस्क्रीमची गाडी मागवायला लागायची. दुपारी ४.३० वाजता गाडी वरळी वरून निघाली आणि वाटेत ऍक्सीडेन्ट होऊन आडवी झाली. बाबांनी दुसरी गाडी मागवली आणि ६.३० वाजता  रिसेप्शन सुरू होण्यापूर्वी आयस्क्रीम हजर केले. याला म्हणतात कमिटमेन्ट.

आपण एक लक्षात घ्यायला हवे कीं आपण जों माल कोणाला पुरवतो तो कदाचित कोणाचा कच्चा माल असतो तर कोणाचा ऑर्डरचा माल असतो. तो जर वेळेत आणि योग्य गुणवत्तेचा नसेल तर? कोण तुम्हांला  व्यवसाय देणार? मग तुम्ही कोणाचे कोण का असेना.

माधव भोळे

आत्मनिर्भर भारत २

 आत्मनिर्भर भारत २

दिवसेंदिवस अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संघर्ष वाढत चालला आहे. अमेरिकेच्या आक्रमक व्यापारी धोरणांमुळे आणि जरुरी पेक्षा जास्त दबावामुळे भारताची अमेरिकेमध्ये असलेली ७०% निर्यात कमी होणार आहे. त्यामुळे त्या निर्यातीशी संबंधित असणारा रोजगार, कच्चा मालाचे व्यापारी, उत्पादक, त्या साखळीवर आणि त्यांच्याशी संबंधित रोजगार यावर सुद्धा नक्कीच परिणाम होणार आहे. 


मोदींच्या कणखर भूमिका घेत अमेरिकेतील मांसाहारी डेयरी प्रोडक्ट्स, जेनुके बदललेली अन्न शृंखला आणि इतर व्यापारास सखत मनाई केल्यामुळे चवताळून ट्रम्प सारख्या लहरी अध्यक्षाने भारतावर खुन्नस काढून टारीफ वाढवून भारताला नामोहरम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. 


अशा परिस्थिती मध्ये एकंदर परराष्ट्र धोरण आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याचे आकलन असून सुद्धा जयमोहन, विष्णुगुप्त, देवधर सारखी काही मंडळी भारताचे काहीही वाकडे होत नाही अशा आशयाच्या पोस्ट रंगवून रंगवून सांगत आहेत. 


अमेरिकेच्या दबावाला बळी पडायचे नाही हे जरी त्रिवार सत्य असले तरी दुसऱ्या देशामध्ये आपल्या वस्तू एक्स्पोर्ट करणे तेथील ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, इम्पोर्ट सब्स्टिटयूट तयार करणे, आत्म निर्भर होणे ह्या गोष्टीला वेळ लागतो. आत्मनिर्भर ह्या गोष्टी साठी सातत्य लागते. त्यामध्ये स्मॉल आणि मिडीयम स्केल कंपन्या आडव्या होतात. आता कुठे करोना परिणामातून त्या नुकत्याच बाहेर येत आहेत.


दिवाळी आणि गणपती मधील रंगीत विद्युत रोषणाई माळा, LED बल्बस, आणि कंदीला सारखा चिनी माल जेव्हा बाजारात ठाण मांडून बसलेला आहे तेव्हा लक्षात येते कीं आपण फेसबुकवर जीव तोडून उठवलेला चिनी उत्पादनवरील बहिष्कार थंड पडला आहे. कारण आपले उद्योगपती उत्पादक कमी आणि व्यापारी जास्त आहेत. आपली क्षमता असून सुद्धा ते रिस्क घ्यायला तयार नसतात. त्यामुळे ते बाहेरून कच्चा माल आणून त्यावर प्रक्रिया करून विकण्यात त्यांना जास्त स्वारस्य असते. संघटित व्यवसाय करण्यासाठी त्यांची तयारी नसते. 

ज्या वेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी नेहरूनी एक चांगली भूमिका घेतली होती. सर्व उत्पादने आणि सेवा भांडवलदारांच्या हातात न राहता त्यातील काही महत्वाची उत्पादने आणि सेवा जसे कीं कोळसा, वीज, तेल, संरक्षण आणि रेल्वे यांना लागणारे पार्टस आणि मशीनरी, मशीन टूल्स, शिपिंग, लॉजिस्टिक्स, टेलिकॉम इत्यादी क्षेत्रामध्ये सरकारी गुंतवणूक आणि नियंत्रण ठेवण्याचा पायंडा पडला. उद्देश हाच होता कीं सरकार कोणावर अवलंबुन राहणार नाही. परंतु त्यांच्या पक्षांनी आणि सरकारी बाबुनी त्या धोरणाची पूर्ण वाट लावली. राज्यकर्ते नालायक असल्यामुळे अजूनही MIDC मधील रस्ता कोणी करायचा याबद्दल वाद घालणारे नोकरशाह असल्यामुळे MIDC सारख्या संस्था पांढरा हत्ती बनत चालल्या. एखाद्या कामाला लागणाऱ्या शेकडो परवानग्या आणि या सर्वांचा परिणाम नोकर शहानचे आणि राजकारण्यांचे खिसे भरण्यात उद्योजक पिचून जातो. 


जर खरोखर मोदीजींना आत्म निर्भर भारत घडवायचा असेल तर राजकारणी आणि नोकरशहा यांच्या भ्रस्टाचारावर कडक कारवाई झाली पाहिजे. पण पवार यांचे गुणगान गाणारे मोदीजी आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवणारे अमित शहा यांना ते कितपत साध्य होईल हे सांगणे कठीण आहे. आज गांव पातळी वर सरपंच पदाचा लिलाव होत आहे तर देश पातळीवर न्यायाधीश आणि इंजिनियर च्या घरी रात्रभर नोटा जाळल्या जात आहेत. ईडी ची कारवाई फक्त विरोधकांना गप्प करण्यासाठी केलेली दिसते पण राज्य भ्रस्टाचार पथके आपला पगार तरी त्या पकडलेल्या पैशातून सरकारकडे जमा करू शकतात का हा प्रश्न आहे?

भारताला जर पहिल्या तीन मधील अर्थ व्यवस्था बनायचे असेल तर भ्रस्टाचाराची कीड समूळ नष्ट व्हायला हवी.


माधव भोळे 


रिल्स आणि फॉलोअर्स

 रिल्स आणि फॉलोअर्स 


सध्या रिल्सचा जमाना आहे. चांगल्या सुसंस्कृत, सुशिक्षित घरातील स्त्रिया आणि मुली यांची अघोषित स्पर्धा सुरू आहे. रोज वेगवेगळी वस्त्रे, दागिने, केश रचना, मेकप इत्यादीचा वापर करून वेगवेगळ्या कोनातून फोटो, रिल्स काढून आपापले फॉलोअर्स वाढवण्याचा आणि त्यायोगे काही उत्पन्न मिळते का हे बघण्याचा आणि प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न सुरू आहे. दररोज आज मीं कशी दिसते या सारखे निरर्थक प्रश्न विचारत आहेत त्याबद्दल हा लेख आहे.


पण ज्या स्त्रिया आणि मुली अशा प्रकारे आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करू इच्छितात त्यांना हे समजायला हवे कीं हे सौंदर्य चार भिंतीच्या बाहेर गेले कीं जसे गुळाला मुंगळे चिकटतात तसें मुंगळे आणि मधमाशा आपल्या जवळ घोंगावत राहणार. 


अनेक नेटकरी मग अशा काही घाणेरड्या कमेंट्स करतात कीं त्या स्त्रिया आणि त्यांचे घरांदाज पती, बंधू, माता पिता, सासू सासरे, दीर आणि नणंदा वाचू शकणार नाहीत. तुम्ही म्हणाल आता समानता आणि स्त्री स्वातंत्र्याचा जमाना आहे. नक्कीच पण त्या वातावरणाचा उपयोग आपल्या शिक्षणासाठी, आपले चांगले छंद जोपसण्यासाठी, स्वतःच्या आणि घराच्या उन्नती आणि आर्थिक प्रगती साठी करायला हवा. वेळ पडली तर किंवा अंगात धमक असेल तर कोणताही व्यवसाय किंवा नोकरीं करून घरादाराच्या किंवा समाज कार्य करून देशसेवेसाठी करायला हवा. 


रील एक किंवा फोटो हे समाज माध्यमासाठी एक कंटेन्ट आहे, जों त्यांना जाहिरातीतून पैसे मिळवून देतो. आता आपण आपल्याला किती एक्स्पोज करायचे ते आपणच ठरवायला हवे. हा जर तुम्ही काही कलाविष्कार, ज्ञान, आपल्या व्यवसाय किंवा उत्पादनाची जाहिरात किंवा अन्य काही माहिती या रिल्स द्वारे समाजाला देणार असाल किंवा ते समाजोपयोगी असेल तर जरूर टाकायला हवे. पण आपले सौंदर्य असे वेशीवर टांगून ठेवू नका असे मला वाटते. बाकी निर्णय ज्याचा त्याचा.


माधव भोळे 

Monday, August 25, 2025

अजब न्याय वर्तुळाचा!

अजब न्याय वर्तुळाचा!

आज CSDS / लोकनीतीचे डायरेक्टर श्री संजय कुमार ह्यांनी X ह्या इंटरेनेट प्लॅटफॉर्मवर आणि पेपर मध्ये वोटर लिस्ट आणि मतदानाबदल चुकीची माहिती दिली आणि त्यानंतर या बाबत माफी मागून सुद्धा त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला असे संजय कुमारच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिल्यामुळे सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश श्री BR  गवई यांनी त्या बाबतीत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांना स्टे दिला आहे. आणि असे नेहमी करीत नाही असेही म्हटले आहे. 


पण न्यायपालिकेपुढे सर्व समान असे म्हणत असताना या आधी एखादी व्यक्ती थेट सुप्रीम कोर्टात न्याय मागायला गेली तर सुप्रीम कोर्ट सांगते, आधी हाय कोर्टात किंवा खालच्या कोर्टात जां आणि तेथे तुम्हांला न्याय नाही मिळाला असे वाटले तर मग वरच्या कोर्टात या असे असताना ह्याच केसच्या बाबतीत शिरस्ता का बदलला?


म्हणजे जों व्यक्ती एका महत्वाच्या पदावर राहून इंटरनेट आणि पेपर मध्ये चुकीची माहिती देऊन देशात "वोटचोरी" च्या नावाखाली जमाव आणि आंदोलन करण्यासाठी कारणीभूत होतो तो माफी मागून नामानिराळा होऊ पाहतो त्याला लगेचा न्याय मिळतो आणि जे वर्षानुवर्षे भगवा दहशतवाद किंवा तत्सम कथित खोट्या कारणासाठी बदनाम होऊन त्यांचे आयुष्य बरबाद केले जाते त्यांना तुरुंगावास? हा कोणता न्याय?


असे संजय कुमारना कोणते विशेष अधिकार घटनेमुळे प्राप्त झाले आहेत कीं ते थेट सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जाऊ शकतात? या आधी गेले काही महिने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानीच कळवले होते कीं "No out of turn hearing", मग आताच का? याचे कारण लोकांना कळायला हवे.


माधव भोळे 

Sunday, August 24, 2025

प्रधानसेवक मोदी जीं!!

 प्रधानसेवक मोदी जीं!!


मोदींची ही तिसरी टर्म सुरू आहे. अनेक विरोधक मोदींवर नाराज आहेत पण देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी कणखर निर्णय घेताना मोदी राजकीय परिणाम काय होतील याकडे संपुर्ण दुर्लक्ष करतात हे विरोधातील विरोधी व्यक्ती सुद्धा मान्य करेल.


या आधी काश्मीरच्या विकासासाठी आणि भारताच्या सुरक्षेसाठी ३७० कलम हटवताना मोदींनी जे साहस दाखवले तेच साहस अमेरिकेच्या दबावाने भारतात शिरू पाहणाऱ्या GMO सिड्स आणि ऑरगॅनिक फूड्स रोखताना केले. भारतीयांच्या फायद्यासाठी इराण आणि रशियाकडून स्वस्त तेल विकत घेण्यासाठी त्यांनी अमेरिकेचा रोष पतकरला. रिझर्व बँकेच्या धोरणामध्ये कॉन्टीजन्सी फ़ंड ची मर्यादा ठरवून घेण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि उरलेला नफा सरकारला लाभांश म्हणून घेऊन तो भारताच्या विकासासाठी योगदान म्हणून वापरण्याची व्यवस्था केली असे अनेक देशहिताचे निर्णय त्यांनी घेतले..


तरुणाई आणि जुगारी लोकांना जुगाराच्या व्यसानाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी सरकारचा २ लाख करोड रुपये जिडीपी देणारा आणि वार्षिक २५,००० करोड रुपये टॅक्स देणारी ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रि ज्यामध्ये पैसे लावले जातात त्या इंडस्ट्रिवर बंदी आणून त्याचा पैसा बँकेत किंवा अन्य मार्गाने जमा होण्यास कारणीभूत होणाऱ्या आस्थापनांना त्यांचे बरोबर व्यवहार केल्यास जबर दंड लावण्याची व्यवस्था केली. या बाबतीत एक ठराव आज लोकसभेत आणि राज्य सभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. टीकाकारांच्या मते जरी या मुळे ४०० कंपन्यामधील २ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्या तरी ४५ करोड लोकांचे २५ ते ३०,००० करोड रुपयाचे नुकसान कमी होऊन ते पैसे इतर त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी आणि संसारासाठी वापरले जातील.


असे निर्णय घ्यायला निर्णयक्षमता तर लागतेच पण लोकांबद्धलचा जिव्हाळा आणि देशप्रेम आवश्यक असते आणि ते मोदीमध्ये ठासून भरले आहे.


आज प्रधानसेवक ही उपाधी नक्कीच सार्थक होत आहे. अशा अनेक विषयांमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता, शारीरिक ताकद आणि लोक प्रतिनिधित्व त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


माधव भोळे 



Thursday, August 21, 2025

ढोल ताशा आणि टाळ मृदूंग

ढोल ताशा आणि टाळ मृदूंग 


आज San Diego ह्या अमेरिकन शहरामध्ये तेथील महाराष्ट्र मंडळाचा ढोल ताशा पथक फोटो बघितला. पुण्यामध्ये गेले काही वर्ष ढोल ताशा पथकाचे फॅड वाढत चाललेले दिसते. पुण्यातील पहिले ढोल ताशा पथक १९६० साली अप्पासाहेब पेंडसे यांनी सुरू केले. विशेषत: गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूकमध्ये सलामी द्यायला अशी पथके वापरली जातात. हल्ली या साठी काही कोर्सेस किंवा सराव क्लासेस सुद्धा घेतले जातात. असे म्हणतात पुण्यात किमान २५० ढोल ताशा पथके आहेत. तरुणाईचा जोश त्यात नक्कीच दिसून येतो. एकमेकातील चढाओढ नक्कीच असते.


पूर्वी ढोल ताशा पथकाचा उपयोग युद्धभूमीवर सैनिकांमध्ये युद्ध ज्वर निर्माण व्हावा, लढायला ऊर्जा मिळावी म्हणून तसेच धार्मिक आणि सामाजिक समारंभा मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून केला जात असे. 


पण ढोल ताशाचा आवाज बघता त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वयस्कर मंडळींना होणारा त्रास आणि कानाचा बहिरे पणा बघता राष्ट्रीय हरित ट्रीब्युनलने यावर मर्यादित संख्या ठेवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगीती दिली. 


एक ढोल ताशा साधारण १०४ ते १०५ डेसिबल पर्यंत ध्वनी निर्माण करतो तर एकत्रित पथक ११३ डेसिबल ध्वनी निर्माण करतो. सर्व साधारण माणसाला ० ते ७० डेसिबल पर्यंत ध्वनी  अतिशय सुसहाय आणि सुरक्षितपणे ऐकता येतो. त्या नंतर त्याच्या कानाला आणि अर्थात मेंदूला सुद्धा त्रास व्हायला सुरवात होते असे मेडिकल शास्त्र सांगते. जर ध्वनी १२० डेसिबल च्या वर गेला तर कानाचा पडदा हमखास फाटतो. अशा परिस्थिती मध्ये ढोल ताशा वाजवणे समाजासाठी किती सुसाह्य आणि सुरक्षित आहे याचा सर्व जनतेने विशेषतः तरुणाईने विचार करायला. असे म्हणतात तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. अर्थात हीच गोष्ट DJ ला सुद्धा लागू आहेच. म्हणून तर महाराष्ट्रात DJ ला कायदेशीर बंदी आहे. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय हरित त्रिब्युनलच्या निर्णयावर का स्टे दिला त्याचे कारण नक्की समजतं नाही. 


आम्ही परंपरा किंवा संस्कृती पाळण्याच्या नक्कीच विरोधात नाही पण आपला आनंद लुटताना दुसऱ्याचे नुकसान होणार नाहींना याची काळजी लोकशाहित अपेक्षित असते. नाहीतर कबुतरांना दाणे घालण्यावरून एव्हडा वादंग मजला नसता.


मला वाटते आपल्या परंपरेमध्ये धार्मिक समारंभ, भजन कीर्तन याठिकाणी फिरत असताना टाळ मृदूंग जास्त चांगला वापरला जाऊ शकेल, जेणेकरून भक्तिमय वातावरण सुद्धा निर्माण होईल आणि ध्वनी प्रदूषणाचा अतिरेक होणार नाही. मृदूंग ढोल ताशा एव्हडे ध्वनी प्रदूषण नक्कीच करीत नसते.


माधव भोळे 

राणीची विहीर

राणीची विहीर 

राणी की वाव ( अर्थात ' राणीची विहीर ' ) ही भारतातील गुजरातमधील पाटण शहरात स्थित एक पायऱ्यांची विहीर आहे. ती सरस्वती नदीच्या काठावर आहे . तिचे बांधकाम ११ व्या शतकातील चौलुक्य राजा भीम पहिला याची पत्नी उदयमती हिने आपल्या पतीच्या स्मरणार्थ केले. गाळाने भरलेली विहीर १९४० च्या दशकात ते पुन्हा शोधले गेली गेली आणि १९८० च्या दशकात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने त्याचे पुनर्संचयित केली . २०१४ पासून ते भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे. पायऱ्यांची विहीर भूमिगत विष्णुचे मंदिर किंवा उलटे मंदिर म्हणून डिझाइन केलेली आहे; पाण्याचे पावित्र्य दर्शवते, पायऱ्यांमधील शिल्पे असंख्य हिंदू देवतांचे चित्रण करतात . ती शिल्पात्मक पॅनेलसह सात स्तरांच्या पायऱ्यांमध्ये विभागली गेली आहे. या पॅनेलमध्ये ५०० हून अधिक प्रमुख शिल्पे आणि एक हजाराहून अधिक लहान शिल्पे आहेत जी धार्मिक, धर्मनिरपेक्ष आणि प्रतीकात्मक प्रतिमा एकत्र करतात. 


मीं ही विहीर पाटण येथे आपले एक मुळे आडनावाचे गृहस्थ यांचेकडे गेलो असता पहिली आहे. 


माधव भोळे 

Monday, August 18, 2025

स्वातंत्रता दिवस, भारत आणि आत्मनिर्भरता

 स्वातंत्रता दिवस, भारत आणि आत्मनिर्भरता 


नुकतेच आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी दिल्ली मधील लाल किल्यावरून १५ ऑगस्ट २०२५ रोजी, भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे खणखणीत भाषण केले. अर्थात स्वातंत्र्य दिन म्हटले म्हणजे आपल्या सर्वांची छाती अभिमानाने फुलून येते. बरोबर याच दिवशी १९४७ साली, ज्या सम्राज्यावरील सूर्य मावळत नाही असे म्हटले जायचे त्या ग्रेट ब्रिटनचा, लाल किल्यावरील युनियन जॅक असलेला झेंडा उतरवून त्या ठिकाणी सुदर्शन चक्र असलेला, भारताचा तिरंगा ध्वज मोठया अभिमानाने फडकू लागला. आपण एका जागतिक सम्राज्याच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. अर्थातच ही अतिशय आनंदाची बाब आहे.  


पण कालच्या एका घटनेने ह्या स्वातंत्र्यावर नक्कीच विचार करायची वेळ आली आहे. २०१६ साली एस्सर ऑइल ह्या भारतीय कंपनीचे काही समभाग, रोसनेफ्ट ह्या रशियन कंपनीने विकत घेतल्यानंतर त्या कंपनीचे नांव नयारा एनर्जी असे झाले. ह्या कंपनीचा भारतातील वाडीनार, गुजरात येथे प्लांट असून ते रशियन ऑइल भारतात रिफाईड करतात आणि त्याची प्रॉडक्ट भारतात आणि जगभरात एक्स्पोर्ट करतात. त्यांच्या प्लांट मध्ये मायक्रोसॉफ्ट क्लाउड कोम्पुटिंगवर वेगववेगळी कॉम्प्युटर अप्लिकेशन चालवली जातात आणि त्यात मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर वापरली जातात. 


युक्रेन आणि रशिया या मधील युद्धामुळे युरोपीयन युनियनने युद्ध समाप्तीसाठी दबाव म्हणून रशियन तेल खरेदीला बंदी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जे देश किंवा कंपन्या रशियन तेल विकत घेतील किंवा विकतील, किंवा रशियन सेवा विकत घेतील तर त्यांना इतर युरोपयन सेवा सुद्धा समाप्त कराव्या असे आदेश युरोपीयन युनियनने दिले आहेत. 


अशा परिस्थितीमध्ये दिनांक २२ जुलै २०२५ रोजी मायक्रोसॉफ्टने नयारा एनर्जीची क्लाऊड सर्व्हिस बंद केली त्यामुळे त्या नयारा एनर्जीच्या वाडीनार रिफायनरी मधील मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरवर चालणारी काही कार्यें बंद पडली. अर्थात नयारा एनर्जीने त्यावर अमेरिकेत कायदेशीर दाद मागितली आहे कारण रशियन तेलावर ना अमेरिकेने बंदी घातली आहे ना भारताने बंदी घातली आहे मग अमेरिकन कंपनी भारतातील कंपनीची सेवा कशी बंद करू शकते?. मायक्रोसॉफ्टने नंतर ती सेवा देणे चालू केले परंतु तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कीं ह्या क्लाऊड कॉम्पुटिंग मुळे कोणतीही अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी अमेरिकेत बसून जगातील कोणाचाही गळा पकडू शकते हे त्यांनी सिद्ध केले. हे नवीन प्रकारचे साम्राज्य आहे. हे आहे क्लाऊड सॉफ्टवेअर साम्राज्य आहे आणि जे देश अमेरिकेचे सॉफ्टवेअर, क्लाऊड सर्व्हर वापरतील ते ह्या अमेरिकेचे गुलाम असतील. असाच प्रयत्न अमेरिका GMO ( genetically modified organism) बियाणे आणि प्रॉडक्ट भारताने विकत घेण्यासाठी दबाव टाकत आहे जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर वर्षानुवर्षे अवलंबुन राहाल.


याचाच अर्थ भारतातील कंपन्यांना दुसऱ्या कोणत्या देशावर अवलंबुन राहायचे नसेल तर भारतील वेबसाईट भारतीय सर्व्हर वर लाँच करायला हव्यात, भारतीय क्लाऊड सर्व्हर, भारतीय डेटा सेंटर्स, भारतीय सॉफ्टवेअर तयार करणे आवश्यक आहे.


ज्या वेळी चीनने स्वतःचे गुगल सारखे सर्च इंजिन ( बायडू ), स्वतःचे ऍमेझॉन ( अलीबाबा एक्सप्रेस ), स्वतःचे फेसबुक ( we Chat ), स्वतःचे X ( sina weibo ), स्वतःचे इंस्टाग्राम ( लिटील रेड बुक ), स्वतःचे चॅट जिपिटी ( डीप सिक ), स्वतःचे क्लाऊड आणि वेब सर्व्हर बनवले त्यावेळी सर्व जगाने त्यांना वेड्यात काढले पण आज वरील घटनेवरून भारताला धडा घ्यायला हवा.


आणि त्याच कारणामुळे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी हीच गोष्ट सांगितली कीं आपल्या देशाला अनेक विषयात आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे त्या पैकी वरील सॉफ्टवेअर आणि सर्व्हर, डेटा सेंटर्स हा एक महत्वाचा भाग आहे. 


आज पर्यंत भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यानी अब्जो डॉलर रुपयांचा व्यवसाय केला परंतु हातांच्या बोटावर मोजण्या एवढ्या कंपन्यानी स्वतःचे सर्व्हर, क्लाऊड कॉम्पुटिंग इत्यादी इन्फ्राष्ट्रक्चर तयार केले आहे. बाकी सर्व कंपन्या परदेशींय इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि परदेशीय सॉफ्टवेअर कंपन्यानवर अवलंबून आहेत. बहुतेक सॉफ्टवेअर कंपन्या दुसऱ्या कंपन्यांचे कंत्राटदार म्हणून काम करतात.


अमेरिकन व्यवसायिक या बाबतीत कितीतरी पुढे आहेत. नुकतेच जानेवारी २०२५ मध्ये एआई चे अमेरिकेतील आणि जगातील सर्वात ताकदवान इन्फ्राष्ट्रकचर तयार करण्यासाठी ओपन एआई ( चॅट जिपिटी तयार करणारी कंपनी ), सॉफ्टबँक विजन फ़ंड ( वेंचर कॅपिटल फर्म) , ओरॅकल, MGX ( युएई स्थित एआई वर गुंतवणूक करणारी कंपनी ) आणि इतर पार्टनर्स ह्या कंपन्यानी एकत्र येऊन १०० बिलीयन डॉलर्स गुंतवणूक करून स्टारगेट नावाचे प्रोजेक्ट ( ए आई इन्फ्रास्त्रक्चर प्रोजेक्ट) सुरू केले आहे जे २०२९ पर्यंत पूर्ण होईल. त्यात पूर्णत्वापर्यंत सुमारे ५०० बिलीयन डॉलर्स ची गुंतवणूक त्यात होईल.


अमेरिकेत एक गोष्ट चांगली आहे, जेथे भरमसाठ गुंतवणूक लागते तेथे वेगवेगळे गुंतवणूकदार एकत्र येऊन सहकार्य करत वेगळी कंपनी स्थापन करतात आणि ते काम करतात. भारतात अशा एकत्र काम करणाऱ्या भारतीय कंपन्या किंवा कॉरपोरेटस मध्ये कमी बघायला मिळतात. कारण या साठी लागणारे आर्थिक व्यवस्थापन आणि आर्थिक इंजिनिरिंग नावीन्य ( Financial engineering innovation ), कायद्याचे राज्य, समान उदिष्ट असलेली समज ( common understanding ), व्यवसायिक व्यवस्थापन ( प्रोफेशनल मॅनेजमेंट ) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांबद्दलचा विश्वास इत्यादी गोष्टींचा अभाव आहे.


जर भारताला जगातील एक आत्मनिर्भर, पुढरलेला देश आणि एक महत्वाची अर्थ व्यवस्था बनायचे असेल तर ह्या गोष्टी करणे आवश्यक आहे.


माधव भोळे.

देवाभाऊ अजब तुझे सरकार!

 देवाभाऊ अजब तुझे सरकार!


"लबाड जोडीती इमल्या माड्या, 

गुणवंतांना मात्र झोपड्या,

पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, 

वेश्येला मणिभार, 

उद्धवा अजब तुझे सरकार.


वाईट तितुके ईथे पोसले,

भलेपणाचे भाग्य नासले, 

या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार 

उद्धवा अजब तुझे सरकार."

ह्या गीताच्या ओळी आपण लहानपणा पासूनच ऐकत आहोत. त्याचा प्रत्यय वारंवार येतो 

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील, तलाठी प्रशांत थोरात यांची ३० जुलै रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात बदली झाल्यामुळे ८ ऑगस्ट २०२५ रोजी उमरी मधील त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना निरोप समारंभ आयोजित केला होता. अशा वेळी साहजिकच आनंदाचे वातावरण असल्यामुळे त्यांनी खुशिमध्ये येऊन "तेरे जैसा यार कहा" हे किशोर कुमारचे गाणे गायले. त्याचा कोणीतरी व्हिडीओ केला आणि तो वायरल केला. त्यामुळे ऑफिस टाईम मध्ये गैरवर्तन केल्याच्या कारणावरून त्याला कामावरून सस्पेंड केले आहे. 


मजा अशी कीं महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक पासून अगदी महानगर पालिकेच्या आणि सरकारच्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये लाचखोरी आणि रेटकार्ड असते अशा आशायाच्या बातम्या पेपरात राजरोस छापून येतात. मध्यंतरी मुंबईतील बिल्डर मंडळींनी लाच देण्याचे प्रमाण वाढले आहे अशी बातमी दिली होती. रेणू कात्रे ह्या महिलेने आत्महत्या केल्या नंतर तिचा पती म्हाडा मधील रजिस्ट्रार, बापू कात्रे महिना २० ते २५ लाख कमवतो अशी तक्रार रेणूच्या भावाने केली होती त्याची फक्त चौकशी सुरू झाली. अशा बातम्या असूनही सरकारचे लाच लुचपत खाते कोणत्याही प्रकारची कारवाई करताना आढळत नाही. हजारो तक्रारी येतात तेव्हा कुठे एखाद्या खालच्या लेव्हल च्या व्यक्तीवर कारवाई होताना दिसते. मोदींच्या वक्तव्या नुसार ७०,००० कोटींचा भ्रस्टाचार करणारे उपमुख्यमंत्री होतात पण एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी / नोकराने काही विशेष प्रसंगी गाणे गायले म्हणून त्याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन लगेच सस्पेंड सुद्धा केले गेले? त्याला फक्त वॉर्निंग देऊन काम झाले असते.


सरकार एवढेच जर शिस्तप्रिय असेल तर भ्रस्टाचाराचे आरोप मंत्री, त्यांचे स्वीय सचिव यांच्यावर होण्यापासून ते मिठी नदी सफाई सारख्या अनेक प्रकरणे गाजली नसती. बिचाऱ्या तुकाराम मुंडे सारखे निर्भयी IAS अधिकारी २० वर्षात २३ वेळा बदली झाले नसते.


असो, 

कली युगात आणखी काय अपेक्षित आहे?


माधव भोळे 

Friday, August 15, 2025

डॉ. राजेंद्र भारूड, एक यशोगाथा!!

 डॉ. राजेंद्र भारूड, एक यशोगाथा!!

माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातीला सामोडे गावात  भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं.  जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती  प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर्पयतची मजल गाठता आलीच नसती.मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं.

आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर - इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं. पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत  होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतर्‍च्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते. एम.बी.बी.एस.च्या  शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता. घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो  आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं. माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.  आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतर्‍च्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा? छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता. पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतर्‍च्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुर्‍खं कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता. वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेर्पयत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो. आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही? जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहे. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते. लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.
( जिल्हाधिकारी, नंदुरबार)( मुलाखत आणि शब्दांकन- माधुरी पेठकर)

भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती

 *भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती*


१) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला 

२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व 

३) महिना: श्रावण 

४) दिवस: अष्टमी 

५) नक्षत्र: रोहिणी 

६) दिवस: बुधवार 

७) वेळ: १२:०० रात्री

८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य. 

९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व

१०) जेव्हा कृष्ण  ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध)  झाले.

११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.

११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते.

१२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.)

१३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती.


*कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.*

मथुरेत कृष्ण, कन्हय्या 

ओडिशामध्ये जगन्नाथ

महाराष्ट्रात विठ्ठल ,विठोबा 

राजस्थानमध्ये श्रीनाथ

गुजरातमध्ये द्वारकाधीश

गुजरातमध्ये रणचोछोड

कर्नाटकातील उडुपी, कृष्णा

केरळमधील गुरुवायुरप्पन 


जन्म ठिकाण:- मथुरा

जन्मदाते माता पिता:- देवकी, वासुदेव

संगोपन करणारे पालक:- यशोदा, नंद

बहीण भाऊ:- सुभद्रा, बलराम,(द्रौपदी मानलेली बहीण.)

गुरु, शिक्षक:-  ऋषी संदिपनी

जिवलग मित्र:- सुदामा


*धर्मपत्नी ८:-* रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)


*कृष्णाची मुले:-* एकूण ८०


*श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.*


*श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु.*


*श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.*


*श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.*


*श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.*


*श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०): प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.*


*श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.*


*श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०):- संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.*


*राधा:-* राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे,' असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. 


*श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु*


*आवडती फुल:-* फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे)


प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते.


*शंख:-* शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.


*आयुधं:-* त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.


*बासरी:-* कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती .


*मोरपंख:-* रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.


*शिक्षण:-* श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.


*कार्य:-* कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले.श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.


*गीता उपदेश:-* महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.


*श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण*


कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार-निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो-कर्तव्याच्या पालनासाठी. वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी. "कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं."

"मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते." गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. "अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही." सर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.

  

*अवतार समाप्ती:-* महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीच वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इ. स. पू. ५५२५ या वर्षी झाला

  

यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।

अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।

परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।।।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे  युगे।।।।


श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय ...

आ. भास्कर जाधव यांचे ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ!

 आ. भास्कर जाधव यांचे ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ!


नुकत्याच एका सभेमध्ये भास्कर जाधव यांनी खोती ह्या विषयावरून बहुजन समाजाला ब्राह्मण समाजा पासून तोडण्याचा प्रयत्न केला.


१९४८ साली लागू झालेला महाराष्ट्र टेनॅन्सी ऍक्ट (कुळ कायदा ) आणि १९६१ साली लागू झालेला land reforms act 1961 नंतर खोती समाप्त झाली. तरी सुद्धा ब्राह्मण समाजाने आपल्या दातृत्वाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर, गावा गावात वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था काढल्या, सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत आपले स्थान सर्व समाजात टिकवून ठेवले आहे. सर्व हिंदू धार्मियांचा हिंदुत्वावर असलेला विश्वास आणि देवा धर्मावर असलेली श्रद्धा त्यांना ब्राह्मण समाजापासून तोडू शकत नाही. सर्वांच्या जन्मापासून ते मृत्यू पश्चातही या मंडळींना ब्राह्मण समाजाची सेवा लागते आणि ती ते आनंदाने देत असतात. 


अशा परिस्थिती मध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये मुसाफिरी करून सुद्धा भास्कर जाधवाना, त्यांना पाहिजे ती किंमत मिळत नाही तसेच विरोधी पक्षाच्या नेते पदाची खिरापत सुद्धा मिळाली नाही हे बघितल्यामुळे त्यांचा मानसिक तोल ढळळलेला दिसतो. त्यामुळे कायम चर्चेत राहण्यासाठी आणि बहुजनांच्या भावना चाळवून त्यांना आपल्या बाजूने करण्यासाठी, इतरांप्रमाणे यांनीही ब्राह्मण समाजाला पंचिंग बॅग म्हणून उपयोगी करण्याचे ठरवलेले दिसते.


पण मला एक कळत नाही की ब्राह्मण समाज भारतात फक्त ३% असताना आणि तो कोकणासारख्या डोंगराळ आड प्रदेशात फक्त ०.०५% सुद्धा नसताना त्यांच्या सारख्या निरूपद्रवी समाजाला टार्गेट करण्यात भास्कर जाधवाना काय आसुरी आनंद मिळत आहे नाही?


खरे म्हणजे दुसऱ्याची रेष छोटी करण्यासाठी ती पुसण्या ऐवजी स्वतःची रेष मोठी करायला हवी हे संस्कार त्यांना मिळाले आहेत किंवा नाही हेच समजतं नाही.

त्यांच्यासारख्या बोल घेवड्या माणसाने आपली शक्ती ब्राह्मणासारख्या निरूपद्रवी समाजाला धोपटण्यात घालवण्या पेक्षा कोकण विभागाचे प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला तर सर्वच कोकण वासिय त्यांचे उपकार विसरणार नाहीत. पण जणू रोगच जडला आहे ब्राह्मणांना टार्गेट करण्याचा तर चांगल्या गोष्टी हातून कशा घडतील? 


लेखक अज्ञात 


मांसाहार बंदी!!

 मांसाहार बंदी!!

महाराष्ट्रातील काही नगरपालिकांनी १५ ऑगस्टच्या दिवशी मांसाहार बंदी केली असून मटण आणि चिकन विकणाऱ्या दुकानाना ते विकण्याचे बंदी करणारे आदेश दिले आहेत. जास्त खोलात गेले असता कळते की गोकुळ अष्टमी आणि पर्युषणाचा पाहिला दिवस असल्यामुळे ही बंदी लागू केली आहे.


मीं पूर्वी दुबईत रहात असताना आम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेवावे लागे. दुबई हे जाहीररित्या मुस्लिम धर्मीय राज्य असल्यामुळे, सरकारी फतव्यामुळे, रमझान महिन्यामध्ये तेथे दिवसा खाद्य पदार्थांची रेस्टॉरंट बंद असायची. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की आपले काय होणार? परंतु तेथील राजाच्या लक्षात आले की दुबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुसलमान लोकांनी रमझान पाळायला हवा म्हणजे बाकीच्यानी तो पाळायलांच असे नाही, हा उद्दात विचार करून त्यांनी अमुस्लिम बांधवांसाठी दिवसासुद्धा ही रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचे किंवा त्यांना होम डिलिव्हरी देण्याचे आदेश दिले आणि आमचा प्रश्न सुटला.


दुबई सारख्या मुस्लिम देशाला हे कळावे आणि आम्ही विविध जात, पंथ, धर्म, संस्कृती असलेल्या एकसंघ राज्यातील लोकांना आणि त्यांच्या प्रतिनिधीना हे कळू नये की आपली आराधना, आपला धर्म, आपले संस्कार आपल्याजवळ ठेवायला हवेत आणि ते आपण दुसऱ्यावर लादु शकत नाहीत. तुम्ही जैन आहात म्हणून महावीर जयंती किंवा पर्युषण दिवसात कोणी मांसाहार करू नये अशी अपेक्षा कशी बाळगू शकता? तुमचा धर्म तुम्ही अवश्य पाळा पण दुसऱ्यावर थोपण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. 


मीं स्वतः पूर्ण शाकाहारी असलो तरी सुद्धा माझे हेच मत आहे.


माधव भोळे 

Tuesday, August 12, 2025

वाटाघाटी, कला आणि तंत्र:

वाटाघाटी, कला आणि तंत्र:


आपण अनेक वेळा एक वाक्य ऐकले आहे "युद्धात जिंकले पण तहात हरले". 


तह म्हणजे काय तर दोन्ही बाजूनी एका ठराविक उदष्टानी एकत्र येऊन वाटाघाटी करून समायिक करार किंवा समझोता करणे म्हणजे तह.


आयुष्यात कोणताही व्यवहार करताना वाटाघाटी करणे अपरिहार्य असते. मग ते एखादे कंत्राट देण्यासाठी पुरवठादाराबरोबर असो की एखादा भूखंड विकत घेताना असो. आपण खरेदीदार असो किंवा आपण विक्रेता असो, वाटाघाटी ओघाने आल्याचं. ज्या ठिकाणी निश्चित किंमत ठरलेली नसते किंवा जे विकण्याच्या अथवा विकत घेण्याच्या सर्व अटी आणि नियम निश्चित नसतात अशा सर्व ठिकाणी वाटाघाटी होणे आवश्यक असते. कित्येक वेळा असे अटी नियम निश्चित असल्या तरी सुद्धा वाटाघाटी होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, फक्त कान आणि डोळे उघडे हवेत. 


वाटाघाटी एक कला आहे आणि तंत्र सुद्धा आहे. कला या साठी की त्यात मानसिक युक्ती खेळ सुद्धा आहे आणि तंत्र आहे कारण त्यामध्ये तांत्रिक बाबी सुद्धा आहेत. दबावतंत्र आहे आणि लवचिकता सुद्धा. 


एखाद्या वाटाघाटी कशा कराव्यात याची हमखास लागू पडेल अशी तंत्रशुद्ध पद्धत जरी नसली तरी ढोबळ मानाने प्रचलित प्रकिया नक्कीच आहे. यातील काही गोष्टी पुढे मांडत आहे पण ह्या मर्यादित नाहीत. काळ, स्थान, परिस्थिती मुळे ह्यामध्ये बदल होऊ शकतात.


प्रभावी वाटाघाटी:

1. तयारी आणि नियोजन:

तुमची ध्येये निश्चित करा: तुम्हांला काय अपेक्षित आहे? तुमचे इच्छित परिणाम आणि तुम्ही काय स्वीकारण्यास तयार आहात ते ओळखा.


दुसऱ्या पक्षाचे संशोधन करा: त्यांच्या गरजा, स्वारस्ये आणि संभाव्य कमकुवतपणा समजून घ्या. 


तुमची मर्यादा नक्की करा: या व्यवहारापासून तुमच्या कमीत कमी अपेक्षा आणि तुम्ही काय स्वीकारण्यास इच्छुक आहात ते ठरवा. 


तुमचे युक्तिवाद तयार करा: तुमच्या मागण्या किंवा अपेक्षांचे समर्थन करण्यासाठी व्यवहाराची तथ्ये आणि आकडेवारी तयार ठेवा. तुम्ही हे का अपेक्षित करता हे समजावून सांगा. वेळ पडल्यास ऑडिओ विस्युअल प्रेसेंटेशन चा वापर करा. 


2. वाटाघाटी दरम्यान:

खंबीर पण आदरयुक्त व्हा: तुमच्या गरजा स्पष्टपणे सांगा.

 

ऐका: दुसरा पक्ष काय म्हणत आहे याकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या प्रश्नांकडे किंवा विषयांकडे सुद्धा लक्ष द्या. शंका वाटल्यास स्पष्टीकरण मागा. काय समजले आहे त्याची उजळणी करा.


सामान्य आधार शोधा: दोन्ही पक्षांच्या विषयांमधील समान भूमिका असलेली क्षेत्रे ओळखा आणि तेथून सुरवात करा.


लवचिक व्हा: ज्या ठिकाणी मुद्यामध्ये थोडीफार तफावत आहे त्या ठीकाणी तडजोड करण्यास आणि सर्जनशील उपाय शोधण्यास तयार व्हा. 

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "If you want to eat a Cake, you will have to give Icing to others " म्हणजे जर तुम्हांला केक खायचा असेल तर त्यावरील क्रीम तुम्हांला दुसऱ्याला द्यायला लागू शकते.


व्यक्तिमत्त्वांवर नव्हे तर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा: कित्येक वेळा समोरची व्यक्ती बघून चर्चा केली जाते. समोरच्या व्यक्तीच्या दडपणाखाली किंवा त्या व्यक्तीबद्धल असलेला पूर्वग्रह लक्षात ठेवून चर्चा केली जाते ते बरोबर नाही. चर्चेत तथ्य आणि समस्या यावर लक्ष केंद्रित करा. 


दुसऱ्या बाजूचा दृष्टीकोन विचारात घ्या: त्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या पडताळून पहा आणि गरज असेल तर त्या ठिकाणी लवचिकता दाखवा. 


धीर धरा: वाटाघाटीला वेळ लागू शकतो, त्यामुळे प्रक्रियेत घाई करू नका. 


3. प्रमुख वाटाघाटी धोरणे:

"निघून जाणे" तंत्र:

ज्या वेळी वाटाघाटी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातं आहे असे लक्षात येईल तेव्हा, वाटाघाटीमधून माघार घ्या. कधी निघून जायचे हे जाणून घेतल्याने तुमची स्थिती मजबूत होऊ शकते आणि तुम्ही हताश नसल्याचे दाखवून देऊ शकता.


पुढाकार घ्या:

उच्च किंवा कमी ऑफरसह प्रारंभ केल्याने वाटाघाटी श्रेणीबद्दल इतर पक्षाच्या समजावर प्रभाव पडू शकतो. कधी कधी अगदी या विरुद्ध प्रथम दुसऱ्याची ऑफर ऐका आणि ती आपल्या अपेक्षेला उतरत असेल तर त्यात सुधारणा होऊ शकते का ते बघा.


संबंध तयार करणे:

इतर पक्षाशी सकारात्मक संबंध प्रस्थापित केल्याने ते तुमच्या प्रस्तावांना अधिक ग्रहणक्षम बनवू शकतात. कित्येकवेळा ह्या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत तरी संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरूच ठेवा कारण ह्या नाही तर दुसऱ्या कामाच्या वेळी ते प्रथम आपल्याशी संपर्क साधतील.


सर्जनशीलतेला प्राधान्य द्या:

विचारमंथन आणि विविध पर्यायांचा शोध घेतल्यास नाविन्यपूर्ण उपाय मिळू शकतात. 


सवलती देणे:

छोट्या सवलती देण्यास तयार असण्याने तुमची लवचिकता आणि तडजोड करण्याची इच्छा दिसून येते.


4. वाटाघाटीनंतर:

कराराची पुष्टी करा: दोन्ही पक्षांनी कराराच्या अटी समजून घेतल्या आहेत आणि त्यावर सहमत आहात याची खात्री करा. 

कराराची अंमलबजावणी करा: मान्य केलेल्या अटी कृतीत आणा.


कधी वेळ मिळाला तर "What they don't teach you at Harvard" हे Mark H. McCormack यांचे पुस्तक वाचा.


माधव भोळे 




Wednesday, August 6, 2025

पहिले पाऊल!

पहिले पाऊल!

देवरुखे उद्योजक ह्या व्हाट्सअप ग्रुपचे प्रवर्तकांचे मार्फत काल दिनांक ३.८.२०२५ रोजी वेस्ट एंड हॉटेल, मारिन लाईन्स ह्या ठिकाणी, देवरुखे बिझिनेस फोरम ह्या ग्रुपने, एक मेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ह्या उक्तीला न्याय देत आजची बिझिनेस फोरम आयोजित केली होती. अतिशय सुरेख आयोजन, वेळेचे काटेकोर नियोजन, उत्कृष्ट निवेदन, जेष्ठ मंडळीचे मार्गदर्शन, तरुण आणि अनुभवी उद्योजक आणि व्यावसायिक यांची उपस्थिती आणि रुचकरं भोजन, ह्या कार्यक्रमाने ह्या सर्वच  आघाड्यांवर बाजी मारली आहे.

आधी केले मग सांगितले ह्या उक्ती प्रमाणे अनिल नवरंगे सर, चंद्रशेखर भडसावळे सर, डॉ पुराणिक, दिवाकर निमकर, संदीप भाटलेकर, नितीन कराडकर, समीर काळे सर इत्यादी मंडळींनी आपले अनुभव दिल खुलासपणे उपस्थितांसमोर मांडले.

अमेय पांगरकर यांच्या  AI वरील भाषणातून AI म्हणजे काही जगावेगळे भूत आहे आणि ते सर्वांनां नाकाम करणार ही  माझ्या सारख्या सर्व सामान्य व्यक्तीच्या मनात असलेली भीती काढून टाकण्याचा रास्त प्रयत्न केला. विशेषत: त्यांनी सांगितले की ज्या कामाला कल्पकता लागते, जे काम आधी कुठेही कोणत्याही मानवाने केलेले नाही ते काम AI ने करण्याचा प्रयत्न करू नका. कारण AI हा एक शिक्षित जादूचा दिवा आहे. जेव्हडे त्याला शिकवलेले असते तेव्हडेच काम तो जास्तीतजास्त योग्य प्रमाणात आणि कमीतकमी वेळात करतो.

Garbage in garbage out ह्या कॉम्पुटर च्या नियमानुसार जर तुम्ही आवश्यक असलेली योग्य माहिती, योग्य पद्धतीने दिलीत तर AI तुम्हांला त्याचे चांगले परिणाम देतो, या उलट चुकीची माहिती दिलीत तर अनपेक्षित उत्तर देतो हे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी बुद्धिमत्तेला पर्याय होऊ शकणार नाही हे त्रिवार सत्य त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांच्या दोन्ही पुस्तकांच्या भेटी बद्दल त्यांचे आणि आयोजकांचे आभार.

नितीन कराडकर सरांनी एका वाक्यात जीवनाचे सर सांगितले "मृत्यू, टॅक्स आणि परिवर्तन" ह्या तीन गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. त्यांना घाबरून जाऊ नका,  तर त्यांना सामोरे जायला शिका.
सरकारी यंत्रणा, GST, यश अपयश हे अडथळे येतच राहणार पण त्याला खंबीर पणे तोंड द्या आणि ठाम उभे रहा.

नवरंगे सर आणि चंद्रशेखर भडसावळे यांनी पर्यावरण संवर्धन, कार्बन क्रेडिट, वेस्ट मॅनेजमेंट ह्या विषयाला हात घालून, माणसाच्या अजून पुढील शंभर पिढ्या सुसहाय्य जगाव्यात ह्या करिता काय उपाय योजना करायला हव्यात ह्याबद्दल सुद्धा चांगले मार्गदर्शन केले.

एकंदरीत कार्यक्रम चांगला झाला. छोटे उद्योजक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील या साठी काय करता येईल या बद्दल सलील कारुळकर यांनी सूचना केली, तिचा विचार करायला हरकत नाही.

आज आपल्या समाजात सुद्धा परिवर्तन होत आहे हे बघून आनंद झाला. आपल्या आणि पुढच्या पिढीला सरस्वती पूजका बरोबरच लक्ष्मी पूजक होण्यासाठी त्यांनी चक्कीवरं ओव्या गायला सुरवात केली आहे. जर आत दाणे टाकले तर आटा नक्कीच बाहेर येणार.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. हे सर्वांच्या लक्षात हळू हळू येत आहे.

भूषण शितूत, दिनेश निमकर, मंदार कानडे, योगेश वीरकर, समीर निमकर, प्रशांत जोशी, श्रीमती शिल्पा भोळे, निशिगंध भडसावळे आणि सर्व आयोजन टीम ला मनःपूर्वक धन्यवाद.

हे पहिले पाऊल आहे. अशी अनेक पावले चालू तेव्हा कोठे हिमालय सर होणार आहे.

सर्व जेष्ठाना नमस्कार, आणि आपले असेच मार्गदर्शन सर्वांनां लाभो हीच प्रार्थना.

माधव भोळे

पण लक्षात कोण घेतो!!

 पण लक्षात कोण घेतो!!


काल देवरुखे बिझिनेस फोरम च्या कॉन्फरन्स मध्ये एक गोष्ट श्री अनिल नवरंगे सर आणि चंद्रशेखर भडसावळे सर यांनी एक विषय मांडला, तो म्हणजे व्यवसाय करताना पर्यावरणाचा आणि सामाजिक भानचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसाय म्हटला की त्या मध्ये पाणी, ऊर्जा, कच्चा माल आणि त्या पासून प्रक्रिया होऊन तयार होणारा माल या मध्ये जरुरी पेक्षा जास्त ऊर्जा वापरणे, तयार होणारी हानिकारक केमिकलं किंवा गॅसेस वातावरणात सोडणे, प्रक्रिया झाल्यानंतर निरूपयोगी वस्तूंच्या कचऱ्याची नीट व्यवस्था न लावणे यासारख्या कृती निश्चितच वातावरणाला हानी पोहोचवतात.


कॉम्पुटर किंवा AI च्या बाबतीत जर बघितले तर निरूपयोगी कॉम्पुटर किंवा त्याचे स्पेयर पार्टस ज्याला e waste किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणतात त्याची नीट व्यवस्था लावणे आवश्यक आहे. त्यात वापरले जाणारे प्लास्टिक, सिलिकॉन तसेच अन्य धातू मटेरियल वातावरणाला घातक आहे. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.


त्याच बरोबर एक महत्वाचा मुद्धा म्हणजे कॉम्पुटरचेजे सर्व्हर आणि डेटा सेंटर असतात, ते चालायला प्रचंड वीज लागते आणि त्याच्या वापरामुळे खूप उष्णता निर्माण होते. जेव्हडी जास्त कॉम्पुटीशन तेव्हडा जास्त वीज वापर आणि तेव्हडी जास्त ऊष्णता निर्माण होते. त्या साठी जरी अपारंपरिक वीज निर्मितीचा वापर केला तरी उष्णता निर्मितीचा मुद्धा राहतोच आणि त्यासाठी वेगवेगळे कुलन्ट ( थंड करणारे पदार्थ वगैरे ) वापरले जातात. 


AI च्या बाबतीत म्हणाल तर एका साध्या प्रश्नासाठी कॉम्पुटरला शेकडो विकल्प बनवून त्यातून योग्य तो परिणाम काढून त्याला मूळ प्रश्नाशी ताडून ते उत्तर आपणांस दिले जाते. अर्थात यासाठी प्रचंड प्रमाणात वीज लागते आणि त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात उष्णता तयार होते. 


अर्थातच ह्या जास्त उष्णतेचा परिणाम पर्यावर्णावर होऊन ग्लोबल वॉर्निंग, समुद्राची लेव्हल वर येणे, अनियमित पाऊस पडणे या सारखे दुष्परिण तयार होतात. ज्याचे परिणाम आपले शेतकरी भोगत असतात.


जसे साधारण पणे १०,००० टीश्यू पेपर बनवायला एक झाड कापले जाते तसेच AI चा एक प्रश्न सोडवण्यासाठी चॅट जिपिटीला ०.३ वॉट hours लागतात. असे हजारो प्रश्न विचारले तर किती विज वाया जाईल आणि किती उष्णता निर्माण होईल याचा तुम्हीच अंदाज लावा. 


मेटा ( फेसबुक ) ह्या एकाच कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीकडे एकाच ठिकाणी २० डेटा सेंटर्स आणि सर्वर असून ४.८ कोटी वर्गफूट एव्हडया जागेवर असून त्याची वीज गरज १४,९७५ गिगा वॉट hours एव्हडी आहे. आणि एक गिगा वॉट hours ७,००,००० घरांना वीज पुरवू शकते. म्हणजे कल्पना करा की एक फेसबुक किंवा इन्स्टाग्राम चा व्हिडीओ किती वीज फुकट घालवत असेल.


हे सर्व्हर आणि डेटा सेंटर थंड ठेवण्यासाठी चीनने आणखी एक नामी युक्ती शोधून काढली ती म्हणजे समूद्राखाली सर्वर आणि डेटा सेंटर ठेवायची म्हणजे तिची उष्णता समुद्राच्या पाण्यात सोडली जाईल आणि ते थंड राहतील. कल्पना जरी वर वर नामी वाटली तरी ते संपूर्ण जगाच्या समुद्राचे तपमान वाढवणार हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे त्यांचा देश थंड राहील आणि उष्णता समुद्रात सोडली जाईल आणि जगात सगळीकडे पसरेल.


याचा अर्थ असा नव्हे की कॉम्पुटर, फेसबुक, इंस्टाग्राम वापरूच नये पण त्यातील चांगल्या गोष्टींचा आग्रह धरा. योग्य तोच वापर करा. 


अमेरिका सारख्या देशात कंझ्यूमरिझम च्या नावाखाली हजारो टन च्या टन tissue पेपर वापरला जातो, लाखो टन प्लास्टिक वापरले जाते. शेकडो टन ई वेस्ट तयार होत असते आणि ह्या सर्वांचा परिणाम संबंध जग भोगत आहे. 


पॅरिस येथील ग्लोबल वार्मिंग परिषदे मध्ये ठराव केल्या प्रमाणे पृथ्वीचे तपमान इंडस्ट्रीयल रिवोलूशन च्या पूर्वीच्या तपमाना पेक्षा १.५ डिग्री पेक्षा जास्त वाढता कामां नये या साठी जास्तीतजास्त झाडें लावणे आणि पर्यावर्णन पूरक काम करणे या साठी प्रत्येक देशाने आपले आर्थिक योगदान देणे आवश्यक असून तसें करायला अमेरिकेने स्पष्ट शब्दात संमती दिलेली नाही. जर पृथ्वीचे तपमान अजून १.५ डिग्री सेल्शियस वाढले तर अजून भयंकर परिणाम भोगावे लागतील असे तज्ञानचे म्हणणे आहे. म्हणजे पृथ्वीचे सर्व रिसॉर्सेस ह्यांनी जास्तीतजास्त वापरायचे आणि त्यांची उष्टी खरकटी बाकीच्या देशानी साफ करायची हे त्यांचे मनसुबे आहेत.


असो आपण आपल्या बाजूनी आपले कर्तव्य करायला हवे. कोणतेही काम करताना पर्यवरणाचा विचार करायलाच हवा. 


माधव भोळे 


विश्वसाचा पाया.

 विश्वसाचा पाया.


आपण नेहमी म्हणतो की अन्य भारतीय व्यवसायात आपआपल्या ज्ञातीमध्ये काम करतात. त्यांच्या बहीण भावाना ते मदत करतात आणि त्यामुळे त्यांचे व्यवसाय वाढतात.


ही ह्या गोष्टीची एक बाजू आहे. दुसरी बाजू आहे विश्वास. सर्वसाधारणपणे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्या लोकांमध्ये ते व्यवसायाची काही एथीक्स पाळतात. ती आपण पाळायला शिकले पाहिजे.

१. Never over commit.: जर आपल्याला एखादी गोष्ट जमणार नसेल तर आधीच सांगा. 

उदा. एका ज्ञाती संस्थेने त्यांच्या ज्ञातीतील एका छोट्या कॅटेररला एका समारंभचे काम दिले होते. थोडी पैशात बचत होईल आणि ज्ञातीबांधवाला काम मिळेल म्हणून. पण समारंभाच्या आदल्या दिवशी त्या व्यक्तीला विचारले तर तिने संगितले की मला जमणार नाही. आता आयत्यावेळी दुसरा कॅटररं कुठून आणणार? आली का पंचाईत. म्हणजेच तुम्ही काम घेतल्यानंतर भले तोटा होवो अथवा फायदा हो, तुम्ही काम करणारच ही खात्री ज्यावेळी तुम्ही ३ / ४ कामातून दाखवून द्याल त्याच वेळी तुम्हांला लोक उभे करतील. कारण सांगून प्रश्न सुटणार नाहीत.

२. तुमच्या व्यवसाय किंवा कामावर तुमची १००% पकड. असली पाहिजे.

एकदा एका ज्ञातीच्या फोटोग्राफरला त्याच ज्ञातीच्या व्यक्तींनी एका विवाह सोहोळ्याचे फोटोग्राफीचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले होते. त्या व्यक्तीने सर्व फोटो काढले. पण प्रत्यक्षात काही तांत्रिक कारणामुळे फोटो आलेच नाहीत. मग ज्याने काम दिले त्याला लग्न घरातून खूप शिव्या पडल्या. कारण ही चूक पुढे सुधारली जाऊ शकते पण पाठच्या विवाहाचे फोटो परत मिळणार नाहीत ना?


३. आपण देत असलेल्या मालाची खात्री करून मग द्या. ( quality control ).

गेले काही वर्ष माझे मित्र मोठया प्रमाणात आंबा व्यवसाय करतात आणि ते सांगतात की मीं बाहेर गावी आंबा पाठवतो. मीं या आधी कधी बाहेरून आंबा विकत घेतला नाही परंतु या वर्षी माझ्या गावी आंबा आला नव्हता म्हणून त्या मित्राला सांगितले की तू एक डझन आंबे मला पाठव. पसंत पडले तर आणखी घेईन. त्याला मीं १५०० डझन ची ऑर्डर कॅनडा मध्ये सुद्धा देणार होतो. त्याने अतिशय सुबक अशा बॉक्स मधून पॅक करून आंबे पाठवले. आंबे आल्यावर उघडले तर त्यातील आंबे दबले गेले होते आणि त्यातील ४ आंबे कुसले होते. त्याला लगेच फोटो पाठवला. त्यानंतर २ दिवसात जवळजवळ ९ आंबे कुसले. आता सांगा एक डझन पैकी ९ आंबे कुसले आणि ३ आंबे बाठीपाशी काळे पडले होते तर कोण ह्याला कॅनडाची ऑर्डर देईल. पण माणूस मनातून उतरला. फेसबुकवर जोरदार मार्केटिंग करत असतो पण प्रत्यक्षात मालाची ग्यारंटी नाही. 


असो अशाच काही गोष्टी तुम्हांला आवडल्या तर लिहीत जाईन.


माधव भोळे 

Friday, August 1, 2025

कली युगात काय चाललंय काय?

 कली युगात काय चाललंय काय?


नुकतेच एक बातमी वाचली. कर्नाटक मधील दक्षिण कन्नड जिल्ह्यामधील धर्मस्थळ ह्या धार्मिक स्थळाची गोष्ट. ह्या ठिकाणचे मंदिर हे मंजुनाथ ह्या शंकर देवाचे मंदिर असून तेथे मधवा वैष्णव पुजारी असून हेगडे नावाच्या अतिशय श्रीमंत अशा जैन कुटुंबियांचे ताब्यात कारभारासाठी आहे.


गेले ८०० वर्ष ह्या ठिकाणी धार्मिक पवित्र कामे होत असून तेथे देश विदेशातून लाखो भक्तगण येतात आणि त्या देवस्थानाला करोडो रुपयांचे उत्पन्न आहे. अनेक भक्तांनी देवस्थानाकडे अनेक जमिनी दान केल्या आहेत. त्यांचे व्यवस्थापन ह्याच कुटुंबियांकडे आहे.


त्या देवस्थानामध्ये १९९५ ते २०१४ पर्यंत काम करणाऱ्या एका सफाई कामगारांने ३ जुलै २०२५ रोजी दोन ऍडव्होकेट ना घेऊन रंगीत फोटो च्या पुराव्या सहित, असा दावा केला की ह्या देवस्थानाच्या परिसरात गेल्या १९ वर्षात १०० हुन अधिक महिला, विद्यार्थिनी यांचेवर बलात्कार करून त्यांचा खून करून  नग्न अवस्थेत त्यांना पुरण्याचे किंवा जाळण्याचे काम त्याला नाईलाजाने करावे लागले. त्यांनें याला विरोध केल्यास त्याला मारून टाकण्याची धमकी दिली गेली आणि दबावाखाली त्यांने हे काम केले असे तो म्हणतो. २०१४ ते आतापर्यंत तो तेथून पळून गेला आणि भूमिगत राहिला परंतु त्याचा अंतरआत्मा त्याला स्वस्थ बसून देत नव्हता. शेवटी त्याने वकिलांचा सल्ला घेऊन कर्नाटक पोलिसांकडे पुरावे सादर केले आणि त्याला संरक्षण देण्याची विनंती केली, कारण हेगडे कुटुंबिय खूप श्रीमंत असून त्यांची पोच वरपर्यंत आहे. ते त्याचा कधीही काटा काढू शकतात. 


ह्या बाबती मध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ( SIT) स्थापन करून त्यांच्यातर्फे ह्या संपूर्ण नीच घृणास्पद कृत्याची चौकशी व्हावे अशी त्याने सरकारला विनंती केली. २००३ साली अनन्या भट नावाची मुलगी अशाच प्रकारे धर्मस्थळ येथे ट्रिप ला गेली असता गायब झाली होती आणि तिची आई सुजाता भट हिने तिचा खूप शोध घेतला आणि नंतर पोलिस तक्रार केली परंतू तिला अनेक धमक्या मिळाल्या मुळे तिने आपली तक्रार पाठी घेतली असे आज SIT पुढे झालेल्या जबाबात तिने सांगितले. 


कर्नाटक महिला राज्य कमिशनच्या पत्रानंतर कर्नाटक चे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता ह्या प्रकरणासाठी SIT चौकशी लावली असून त्यामध्ये चौकशी सुरू झाली आहे.


या आधी महाराष्ट्रात शनि शिंगणापूर येथील रंजक कथा आपण वाचल्याच असाल ज्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शनि शिंगणापूर येथे २५८  कर्मचारी आवश्यक असताना २४६४ कर्मचारी काम करत आहेत असे दाखवून गेले १० वर्ष वाढीव कर्मचाऱ्यांचा पगार गायब होतो असे स्वतः फडणवीस म्हणाले आणि त्या विषयात चौकशी लावली आहे असे सांगितले.


श्रद्धाळु भक्त आपल्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आणि संपत्ती दान करीत असताना त्याची भर कोठे होते याचा विचार प्रत्येक देणगीदाराने करायला हवा. धर्मात सतपात्री दान धर्म करावा असे म्हटले आहे. ते पैसे जर सत्ताधिशांच्या आणि ठगांच्या खिशात जातं असतील तर त्या साठी उपाय योजना होणे आवश्यक आहे.


कलीला असाच सोडला तर एकदिवस तो सर्वांचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवायला हवे.


माधव भोळे