Monday, August 25, 2025

अजब न्याय वर्तुळाचा!

अजब न्याय वर्तुळाचा!

आज CSDS / लोकनीतीचे डायरेक्टर श्री संजय कुमार ह्यांनी X ह्या इंटरेनेट प्लॅटफॉर्मवर आणि पेपर मध्ये वोटर लिस्ट आणि मतदानाबदल चुकीची माहिती दिली आणि त्यानंतर या बाबत माफी मागून सुद्धा त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला असे संजय कुमारच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिल्यामुळे सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश श्री BR  गवई यांनी त्या बाबतीत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांना स्टे दिला आहे. आणि असे नेहमी करीत नाही असेही म्हटले आहे. 


पण न्यायपालिकेपुढे सर्व समान असे म्हणत असताना या आधी एखादी व्यक्ती थेट सुप्रीम कोर्टात न्याय मागायला गेली तर सुप्रीम कोर्ट सांगते, आधी हाय कोर्टात किंवा खालच्या कोर्टात जां आणि तेथे तुम्हांला न्याय नाही मिळाला असे वाटले तर मग वरच्या कोर्टात या असे असताना ह्याच केसच्या बाबतीत शिरस्ता का बदलला?


म्हणजे जों व्यक्ती एका महत्वाच्या पदावर राहून इंटरनेट आणि पेपर मध्ये चुकीची माहिती देऊन देशात "वोटचोरी" च्या नावाखाली जमाव आणि आंदोलन करण्यासाठी कारणीभूत होतो तो माफी मागून नामानिराळा होऊ पाहतो त्याला लगेचा न्याय मिळतो आणि जे वर्षानुवर्षे भगवा दहशतवाद किंवा तत्सम कथित खोट्या कारणासाठी बदनाम होऊन त्यांचे आयुष्य बरबाद केले जाते त्यांना तुरुंगावास? हा कोणता न्याय?


असे संजय कुमारना कोणते विशेष अधिकार घटनेमुळे प्राप्त झाले आहेत कीं ते थेट सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जाऊ शकतात? या आधी गेले काही महिने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानीच कळवले होते कीं "No out of turn hearing", मग आताच का? याचे कारण लोकांना कळायला हवे.


माधव भोळे 

No comments:

Post a Comment