Wednesday, August 6, 2025

पण लक्षात कोण घेतो!!

 पण लक्षात कोण घेतो!!


काल देवरुखे बिझिनेस फोरम च्या कॉन्फरन्स मध्ये एक गोष्ट श्री अनिल नवरंगे सर आणि चंद्रशेखर भडसावळे सर यांनी एक विषय मांडला, तो म्हणजे व्यवसाय करताना पर्यावरणाचा आणि सामाजिक भानचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसाय म्हटला की त्या मध्ये पाणी, ऊर्जा, कच्चा माल आणि त्या पासून प्रक्रिया होऊन तयार होणारा माल या मध्ये जरुरी पेक्षा जास्त ऊर्जा वापरणे, तयार होणारी हानिकारक केमिकलं किंवा गॅसेस वातावरणात सोडणे, प्रक्रिया झाल्यानंतर निरूपयोगी वस्तूंच्या कचऱ्याची नीट व्यवस्था न लावणे यासारख्या कृती निश्चितच वातावरणाला हानी पोहोचवतात.


कॉम्पुटर किंवा AI च्या बाबतीत जर बघितले तर निरूपयोगी कॉम्पुटर किंवा त्याचे स्पेयर पार्टस ज्याला e waste किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणतात त्याची नीट व्यवस्था लावणे आवश्यक आहे. त्यात वापरले जाणारे प्लास्टिक, सिलिकॉन तसेच अन्य धातू मटेरियल वातावरणाला घातक आहे. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.


त्याच बरोबर एक महत्वाचा मुद्धा म्हणजे कॉम्पुटरचेजे सर्व्हर आणि डेटा सेंटर असतात, ते चालायला प्रचंड वीज लागते आणि त्याच्या वापरामुळे खूप उष्णता निर्माण होते. जेव्हडी जास्त कॉम्पुटीशन तेव्हडा जास्त वीज वापर आणि तेव्हडी जास्त ऊष्णता निर्माण होते. त्या साठी जरी अपारंपरिक वीज निर्मितीचा वापर केला तरी उष्णता निर्मितीचा मुद्धा राहतोच आणि त्यासाठी वेगवेगळे कुलन्ट ( थंड करणारे पदार्थ वगैरे ) वापरले जातात. 


AI च्या बाबतीत म्हणाल तर एका साध्या प्रश्नासाठी कॉम्पुटरला शेकडो विकल्प बनवून त्यातून योग्य तो परिणाम काढून त्याला मूळ प्रश्नाशी ताडून ते उत्तर आपणांस दिले जाते. अर्थात यासाठी प्रचंड प्रमाणात वीज लागते आणि त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात उष्णता तयार होते. 


अर्थातच ह्या जास्त उष्णतेचा परिणाम पर्यावर्णावर होऊन ग्लोबल वॉर्निंग, समुद्राची लेव्हल वर येणे, अनियमित पाऊस पडणे या सारखे दुष्परिण तयार होतात. ज्याचे परिणाम आपले शेतकरी भोगत असतात.


जसे साधारण पणे १०,००० टीश्यू पेपर बनवायला एक झाड कापले जाते तसेच AI चा एक प्रश्न सोडवण्यासाठी चॅट जिपिटीला ०.३ वॉट hours लागतात. असे हजारो प्रश्न विचारले तर किती विज वाया जाईल आणि किती उष्णता निर्माण होईल याचा तुम्हीच अंदाज लावा. 


मेटा ( फेसबुक ) ह्या एकाच कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीकडे एकाच ठिकाणी २० डेटा सेंटर्स आणि सर्वर असून ४.८ कोटी वर्गफूट एव्हडया जागेवर असून त्याची वीज गरज १४,९७५ गिगा वॉट hours एव्हडी आहे. आणि एक गिगा वॉट hours ७,००,००० घरांना वीज पुरवू शकते. म्हणजे कल्पना करा की एक फेसबुक किंवा इन्स्टाग्राम चा व्हिडीओ किती वीज फुकट घालवत असेल.


हे सर्व्हर आणि डेटा सेंटर थंड ठेवण्यासाठी चीनने आणखी एक नामी युक्ती शोधून काढली ती म्हणजे समूद्राखाली सर्वर आणि डेटा सेंटर ठेवायची म्हणजे तिची उष्णता समुद्राच्या पाण्यात सोडली जाईल आणि ते थंड राहतील. कल्पना जरी वर वर नामी वाटली तरी ते संपूर्ण जगाच्या समुद्राचे तपमान वाढवणार हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे त्यांचा देश थंड राहील आणि उष्णता समुद्रात सोडली जाईल आणि जगात सगळीकडे पसरेल.


याचा अर्थ असा नव्हे की कॉम्पुटर, फेसबुक, इंस्टाग्राम वापरूच नये पण त्यातील चांगल्या गोष्टींचा आग्रह धरा. योग्य तोच वापर करा. 


अमेरिका सारख्या देशात कंझ्यूमरिझम च्या नावाखाली हजारो टन च्या टन tissue पेपर वापरला जातो, लाखो टन प्लास्टिक वापरले जाते. शेकडो टन ई वेस्ट तयार होत असते आणि ह्या सर्वांचा परिणाम संबंध जग भोगत आहे. 


पॅरिस येथील ग्लोबल वार्मिंग परिषदे मध्ये ठराव केल्या प्रमाणे पृथ्वीचे तपमान इंडस्ट्रीयल रिवोलूशन च्या पूर्वीच्या तपमाना पेक्षा १.५ डिग्री पेक्षा जास्त वाढता कामां नये या साठी जास्तीतजास्त झाडें लावणे आणि पर्यावर्णन पूरक काम करणे या साठी प्रत्येक देशाने आपले आर्थिक योगदान देणे आवश्यक असून तसें करायला अमेरिकेने स्पष्ट शब्दात संमती दिलेली नाही. जर पृथ्वीचे तपमान अजून १.५ डिग्री सेल्शियस वाढले तर अजून भयंकर परिणाम भोगावे लागतील असे तज्ञानचे म्हणणे आहे. म्हणजे पृथ्वीचे सर्व रिसॉर्सेस ह्यांनी जास्तीतजास्त वापरायचे आणि त्यांची उष्टी खरकटी बाकीच्या देशानी साफ करायची हे त्यांचे मनसुबे आहेत.


असो आपण आपल्या बाजूनी आपले कर्तव्य करायला हवे. कोणतेही काम करताना पर्यवरणाचा विचार करायलाच हवा. 


माधव भोळे 


No comments:

Post a Comment