Friday, August 15, 2025

आ. भास्कर जाधव यांचे ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ!

 आ. भास्कर जाधव यांचे ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ!


नुकत्याच एका सभेमध्ये भास्कर जाधव यांनी खोती ह्या विषयावरून बहुजन समाजाला ब्राह्मण समाजा पासून तोडण्याचा प्रयत्न केला.


१९४८ साली लागू झालेला महाराष्ट्र टेनॅन्सी ऍक्ट (कुळ कायदा ) आणि १९६१ साली लागू झालेला land reforms act 1961 नंतर खोती समाप्त झाली. तरी सुद्धा ब्राह्मण समाजाने आपल्या दातृत्वाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर, गावा गावात वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था काढल्या, सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत आपले स्थान सर्व समाजात टिकवून ठेवले आहे. सर्व हिंदू धार्मियांचा हिंदुत्वावर असलेला विश्वास आणि देवा धर्मावर असलेली श्रद्धा त्यांना ब्राह्मण समाजापासून तोडू शकत नाही. सर्वांच्या जन्मापासून ते मृत्यू पश्चातही या मंडळींना ब्राह्मण समाजाची सेवा लागते आणि ती ते आनंदाने देत असतात. 


अशा परिस्थिती मध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये मुसाफिरी करून सुद्धा भास्कर जाधवाना, त्यांना पाहिजे ती किंमत मिळत नाही तसेच विरोधी पक्षाच्या नेते पदाची खिरापत सुद्धा मिळाली नाही हे बघितल्यामुळे त्यांचा मानसिक तोल ढळळलेला दिसतो. त्यामुळे कायम चर्चेत राहण्यासाठी आणि बहुजनांच्या भावना चाळवून त्यांना आपल्या बाजूने करण्यासाठी, इतरांप्रमाणे यांनीही ब्राह्मण समाजाला पंचिंग बॅग म्हणून उपयोगी करण्याचे ठरवलेले दिसते.


पण मला एक कळत नाही की ब्राह्मण समाज भारतात फक्त ३% असताना आणि तो कोकणासारख्या डोंगराळ आड प्रदेशात फक्त ०.०५% सुद्धा नसताना त्यांच्या सारख्या निरूपद्रवी समाजाला टार्गेट करण्यात भास्कर जाधवाना काय आसुरी आनंद मिळत आहे नाही?


खरे म्हणजे दुसऱ्याची रेष छोटी करण्यासाठी ती पुसण्या ऐवजी स्वतःची रेष मोठी करायला हवी हे संस्कार त्यांना मिळाले आहेत किंवा नाही हेच समजतं नाही.

त्यांच्यासारख्या बोल घेवड्या माणसाने आपली शक्ती ब्राह्मणासारख्या निरूपद्रवी समाजाला धोपटण्यात घालवण्या पेक्षा कोकण विभागाचे प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला तर सर्वच कोकण वासिय त्यांचे उपकार विसरणार नाहीत. पण जणू रोगच जडला आहे ब्राह्मणांना टार्गेट करण्याचा तर चांगल्या गोष्टी हातून कशा घडतील? 


लेखक अज्ञात 


No comments:

Post a Comment