Thursday, July 2, 2026

रंगांची वाटणी??

रंगांची वाटणी??


पांढऱ्या रंगाच्या पटट्या मारल्यामुळे भडकलेले वातावरण शांत करण्यासाठी  काही जैन मंडळी राज ठाकरे यांना भेटायला गेली होती. 


खरे म्हणजे रंगाची निर्मिती देवांनी केली. आकाशातील इंद्रधनुष्या पासून ते फुलांतील आणि फुलपाखरातील विविध रंग, विविध रंगांचे पक्षी, पाने, फुले हीं निसंशय निसर्गाची निर्मिती आहे. असे असताना पांढरा रंग जैनांचा, हिरवा रंग इस्लामचा, भगवा रंग हिंदूंचा, निळा रंग आंबेडकरवादी बुद्धांचा, निळा आणि पिवळा रंग शिखांचा अश्या वाटण्या आपणच करून घेतल्या. त्या रंगावरून राजकारण आणि समाजकारण सुरू झाले, आणि त्यातून वाद.


पण इंद्रधनुष्याचे रंग कधी आपसात लढतांना दिसतात का? कधी ते आपला क्रम बदलतात का? जांभळ्या  ( violet ) रंगाने कधी लाल रंगाला म्हटले का कीं तुझ्या आणि माझ्या क्रमात अदलाबद्दल करूया?. 

फुलपाखराचे रंग एकाच पंखावर असताना त्यांची तक्रार आपण कधी ऐकली का? सिताफळ कधी सफरचंदाला म्हणाले का कीं तुझा रंग मला दे. 


मग आपणच आपसात असे का भांडतो? 

आपले धर्मपंडित आपल्याला कधीच सांगत नाहीत कीं शंकराला लाल फुल वाहू नका किंवा कृष्णाला पांढरे फुल वाहू नका. ते फक्त त्या देवतांचे प्रियफुल किंवा प्रिय रंग सांगतात. आमच्या अंबाबाईला आणि गणपतीला लाल रंग, कृष्णाला निळा, तर शंकराला सफेद रंग आवडतो.


आपला धर्म सांगतो कीं जसा भाव तसा देव. तुमच्या कडे अमुक फुल नाही तर तुम्ही दुसरे फुल वापरा, ते सुद्धा नसेल तर अक्षता वहा. त्या सुद्धा नसतील तर हळद पिंजर वहा. आपल्या देवांना कोणताही रंग वर्ज्य नाही. मग आपण फक्त भगव्यालाच का महत्व द्यायचे? बाकीच्या रंगांवरील आपले प्रेम कमी आहे का? 


सर्व रंग आमच्यासाठी समान प्रियतेचे असायला हवेत. व्यक्तिगत प्राध्यान आपले आपण ठरवू शकायला हवे. आम्हाला कोणी एकाच रंगाने बांधायची काय गरज आहे.


विचार करा


माधव भोळे 

No comments:

Post a Comment